15 वर्षांनंतर कामाठीपुऱ्यातील कुटुंबाला न्याय, अवघ्या चार तासांत म्हाडाच्या मास्टर लिस्टसाठी झाले पात्र

15 वर्षांनंतर कामाठीपुऱ्यातील कुटुंबाला न्याय, अवघ्या चार तासांत म्हाडाच्या मास्टर लिस्टसाठी झाले पात्र

कामाठीपुरा येथील जुन्या उपकरप्राप्त इमारतीतील दौलत अधिकारी या रहिवाशाचा 15 वर्षांपासून प्रलंबित राहिलेला मास्टर लिस्टवरील पात्रतेचा प्रश्न निकाली काढत म्हाडा उपाध्यक्षांनी या अर्जदाराला तत्काळ न्याय मिळवून दिला. ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली आज म्हाडात झालेल्या लोकशाही दिनात या रहिवाशाने आपली कैफियत मांडल्यानंतर लगेचच मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दौलत अधिकारी यांची सुनावणी घेतली. त्यानंतर अवघ्या 4 तासांतच त्यांना मास्टर लिस्टसाठी पात्र घोषित करण्यात आले व पात्रता निश्चितीचे पत्रदेखील देण्यात आले. त्यामुळे या रहिवाशांचे हक्काच्या घराचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. या लोकशाही दिनात नागरिकांच्या 15 अर्जांवर सुनावणी झाली.

कामाठीपुरातील जुन्या उपकरप्राप्त इमारतीतील दौलत अधिकारी यांचे 1976मध्ये म्हाडातर्फे विक्रोळी येथील संक्रमण शिबिरात स्थलांतर करण्यात आलेले. दरम्यान, कामाठीपुरामधील त्यांच्या इमारतीचा पुनर्विकास होऊ शकला नाही. त्यामुळे अधिकारी यांनी मास्टर लिस्टमधील कायमस्वरूपी गाळा मिळण्यासाठी 2010मध्ये अर्ज केला. कागदपत्रांच्या त्रुटीमुळे त्यांची पात्रता 15 वर्षांपासून प्रलंबित राहिली होती. लोकशाही दिनाच्या माध्यमातून त्यांनी म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्यासमोर आपले म्हणणे मांडले. जयस्वाल यांनी अर्जदाराचे म्हणणे समजावून घेतले व मंडळाच्या अधिकाऱ्यांना तातडीने या प्रकरणी सुनावणी घेण्याचे आदेश दिले. लोकशाही दिन झाल्यानंतर काही तासांतच मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दौलत अधिकारी यांची सुनावणी घेतली व तत्काळ त्यांच्या पात्रतेचा निर्णय जाहीर केला. मंडळातर्फे अवघ्या 4 तासांत त्यांना मास्टर लिस्टसाठी पात्र घोषित करण्यात आले व कायमस्वरूपी घर मिळण्यासाठी पात्रता निश्चितीचे पत्रदेखील देण्यात आले.

एसटी कर्मचाऱ्याला दिलासा

राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी असलेला साहेबराव गायकवाड पुण्यातील तळेगाव दाभाडे येथील गृहनिर्माण योजनेमध्ये सोडतीद्वारे अत्यल्प उत्पन्न गटाच्या सदनिकेसाठी यशस्वी अर्जदार ठरले. मात्र आर्थिक अडचणींमुळे गायकवाड त्यांना घराची रक्कम म्हाडाकडे भरण्यास उशीर झाला. म्हाडाने त्यांना 75 हजार रुपये विलंब शुल्क भरण्याचे पत्र पाठवले. हे विलंब शुल्क माफ करावे, असा अर्ज त्यांनी केला होता. लोकशाही दिनात त्यांचे हे विलंब शुल्क माफ करण्यात आले असून घराची विक्री किंमत भरलेली असल्याने उद्याच घराचा ताबा देण्याचे आदेश संजीव जयस्वाल यांनी दिले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ITR मुदतवाढीचे वृत्त फेटाळले नंतर दिली एक दिवसाची मुदतवाढ; आयकर विभागाची माहिती ITR मुदतवाढीचे वृत्त फेटाळले नंतर दिली एक दिवसाची मुदतवाढ; आयकर विभागाची माहिती
आयकर रिटन्स भरण्याची अंतिम मुदत 15 सप्टेंबर होती. याआधी 31 जुलैची मुदत वाढवून ती 15 सप्टेंबर करण्यात आली होती. मात्र,...
देहरादूनमधील सहस्त्रधारा येथे ढगफुटी, 100 जणांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 16 सप्टेंबर 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस
ज्वेलर्सकडून पैसे उकळले, जीआरपीच्या तीन पोलिसांना अटकपूर्व जामीन
15 वर्षांनंतर कामाठीपुऱ्यातील कुटुंबाला न्याय, अवघ्या चार तासांत म्हाडाच्या मास्टर लिस्टसाठी झाले पात्र
आमच्या घरांचा प्रश्न सोडवा, अन्यथा मुंबईतच झोपड्या बांधू; गिरणी कामगारांचा सरकारला इशारा
आचार्य देवव्रत यांनी घेतली राज्यपाल पदाची शपथ