लोकांना मूर्ख बनवू शकतो तोच खरा नेता, गडकरींचे सत्याचे बोल

लोकांना मूर्ख बनवू शकतो तोच खरा नेता, गडकरींचे सत्याचे बोल

‘राजकारणात मनापासून खरं बोलण्याला मनाई आहे. तिथं हौशे, नवशे, गवशे आहेत. त्यातला जो कोणी लोकांना व्यवस्थित मूर्ख बनवू शकतो, तोच खरा नेता,’ हे सत्य केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आज सांगितले. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.

अखिल भारतीय महानुभाव परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी त्यांनी राजकारणातील वास्तव मांडले. ‘बोलणे हे कृतीपेक्षा नेहमीच सोपे असते. मात्र राजकारणात खरे बोलण्यावर बंदी आहे. मनापासून एखादी गोष्ट बोलणे हे तिथे अडचणीचे ठरते. हौश, नवशे, गवशे असे सगळे लोक येथे असतात. प्रत्येकाची स्वतःची शैली आणि हेतू असतो. शेवटी जो लोकांना सतत मूर्ख बनवून एखादी गोष्ट त्यांच्या गळी उतरवतो, तोच यशस्वी ठरतो, असे गडकरी म्हणाले.

पण अंतिम विजय सत्याचाच!

एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी शॉर्टकट आहे. नियम मोडून शॉर्टकटने माणूस लवकर जाऊ शकतो. एखादा रस्ता क्रॉस करताना सिग्नल तोडून, उडी मारून जाताही येईल, पण हा शॉर्टकट धोकादायकही ठरू शकतो. शॉर्टकटचे आयुष्य कमी असते. त्यामुळेच आपल्यामध्ये प्रामाणिकपणा, विश्वासार्हता, समर्पण, सुसंस्कृतपणा, सत्यनिष्ठा हे गुण असायलाच हवेत. कारण, अंतिम विजय हा सत्याचाच होतो हे भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेत सांगून ठेवलंय, हेही गडकरींनी स्पष्ट केलं.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कश्मीरचे सफरचंद संकटात! राष्ट्रीय महामार्गावर शेकडो ट्रक वाहतूक कोंडीत अडकले, जम्मू-कश्मीरमधील फळ मार्केट दोन दिवस बंद कश्मीरचे सफरचंद संकटात! राष्ट्रीय महामार्गावर शेकडो ट्रक वाहतूक कोंडीत अडकले, जम्मू-कश्मीरमधील फळ मार्केट दोन दिवस बंद
कश्मीर खोऱ्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस, भूस्खलन आणि पुराच्या पाण्याचे संकट ओढावले आहे. त्यातच आता जम्मू-कश्मीरमधील फळ मार्केट दोन...
अन्नधान्य महागले! ऑगस्टमध्ये घाऊक महागाई दर 0.52 टक्क्यांवर
एटीएम कार्ड विसरा, आता मोबाईलने कॅश काढा! यूपीआयचा वापर करून पैसे काढणे होणार सोपे
चीनचे फुजियान समुद्रात उतरले, अमेरिका चिंतेत
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार घसरला
आयटीआरची डेडलाईन वाढल्याचा दावा खोटा
टेक्सासमध्ये शरीया कायद्याला नो एण्ट्री