भीमा नदीचा पूर ओसरला; नुकसानीचे त्वरित पंचनामे करा

भीमा नदीचा पूर ओसरला; नुकसानीचे त्वरित पंचनामे करा

भीमा नदी खोऱ्यात मोठय़ा प्रमाणात उसाचे क्षेत्र आहे. याच ऊस पिकात भीमा नदीच्या पुराचे पाणी शिरले आहे. त्यामुळे ऊस पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत आहे. उसाबरोबर केळी व इतर पिकेदेखील पाण्याखाली गेली आहेत. पाण्यात बुडालेल्या पिकांची नासाडी झाली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील मातीचे बांध, शेताचे भराव वाहून गेले आहेत. आता नदीचा पूर ओसरू लागला आहे. त्यामुळे प्रशासनाने नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावेत आणि नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

उजनी व वीर धरणातून भीमा (चंद्रभागा) नदीत मोठय़ा प्रमाणात विसर्ग सोडण्यात आला होता. सध्या विसर्ग कमी झाला आहे. त्यामुळे धोक्याच्या पातळीवरून वाहणारी भीमा नदी इशारा पातळीवरून वाहत आहे. नदीपात्रातील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे उघडे झाले असून, त्यावरून वाहतूकही सुरू झाली आहे. तर, शेती पिकात शिरलेले पाणीदेखील ओसरून गेले आहे. पाणी कमी झाल्याने पिके उघडी पडू लागली आहेत.

पंढरपूर येथे 1 लाख 90 हजार क्युसेकचा विसर्ग आल्यामुळे भीमा नदीपात्रापासून पाच किमीपर्यंत शेतात पाणी शिरले होते. देगाव व अर्जुनसोंड येथील ओढय़ाद्वारे पाच किमीपर्यंत पाणी शेतात शिरले आहे. या पाण्याने शेती पिकांची नासाडी झाली आहे. जनावरांच्या चाऱ्याच्या गंजी, ढेपणी वाहून गेल्या आहेत. तर, नदीकाठच्या गावातील अनेक घरात पाणी शिरल्याने पडझड झाली आहे. शेतातील बांध वाहून गेले आहेत. नदीकाठच्या शेताची माती वाहून गेली आहे. त्यामुळे ऊस व केळी पिकासह शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गणरायाच्या आगमनापूर्वी प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

घरांचेही पंचनामे करा
पंढरपूर शहरातील अंबाबाई पटांगण परिसर, व्यासनारायण झोपडपट्टी तसेच संत पेठ येथील मिळून 134 घरांत पाणी शिरले. तर, 543 लोकांना स्थलांतरित व्हावे लागले. तसेच ग्रामीण भागातील 35 घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे 171 लोकांना स्थलांतरित करावे लागले होते. एकूण 169 घरांचा पंचनामा करावा लागणार आहे.

ज्या ठिकाणचे पाणी कमी झाले आहे तेथील नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहेत. पाणी कमी होताच सर्वच पंचनामे करण्यात येणार आहेत. नदीवरील सर्व बंधाऱ्यांवरून वाहतूक सुरू झाली आहे.
– सचिन लंगुटे, तहसीलदार, पंढरपूर

भीमा नदीकाठच्या पिराची कुरोली, वाडीकुरोली, शेळवे, खेडभाळवणी, कौठळी, व्होळे, खेडभोसे, देवडे, पटवर्धन कुरोली, आव्हे, पेहे, सांगवी, बादलकोट, उंबरे, करोळे, कान्हापुरी गावांतील पूर परिस्थितीची पाहणी केली असून, नुकसानीचे पंचनामे तत्काळ करण्यात यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
– अभिजित पाटील, आमदार

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मेधा इंजिनीयरिंगचा दंड माफ; जप्त केलेली वाहनं, यंत्रसामुग्रीही परत करण्याचे आदेश! रोहित पवारांनी विधानसभेतील उत्तराचे पुरावे केले सादर मेधा इंजिनीयरिंगचा दंड माफ; जप्त केलेली वाहनं, यंत्रसामुग्रीही परत करण्याचे आदेश! रोहित पवारांनी विधानसभेतील उत्तराचे पुरावे केले सादर
इलेक्ट्रोल बाँडच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाची मदत करणाऱ्या मेधा इंजिनीयरिंग कंपनीचा ९० कोटी रुपयांचा दंड माफ केल्याचा मुद्दा चांगलाच पेटला...
पित्तावर करा ‘हे’ घरगुती खात्रीशीर उपाय, वाचा
नेपाळच्या राष्ट्रपतींच्या निवासस्थानावर ‘Gen-Z’ आंदोलकांचा कब्जा, 5 मंत्र्यांचा राजीनामा, पंतप्रधान दुबईला पळण्याच्या तयारीत
गेल्या 11 वर्षात देशात वाढली साक्षरता, पाच राज्य झाली 100 टक्के साक्षर
स्कॉर्पिओ-मोटारसायकल अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, गंगापूर-वैजापूर रोडवरील वरखेड येथील घटना
कर्नाटकात विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक; 8 जखमी, 21 जणांना अटक
Health Tips – लिवरच्या उत्तम आरोग्यासाठी ‘ही’ फळे खायलाच हवीत, वाचा