स्कॉर्पिओ-मोटारसायकल अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, गंगापूर-वैजापूर रोडवरील वरखेड येथील घटना

स्कॉर्पिओ-मोटारसायकल अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, गंगापूर-वैजापूर रोडवरील वरखेड येथील घटना

गंगापूर-वैजापूर रोडवरील वरखेडजवळ स्कॉर्पिओने मोटारसायकलला समोरासमोर धडक दिल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सजन राजू राजपूत (२८, ह.मु. वाळूज, सटाणा, वैजापूर) हे पत्नी शीतल सजन राजपूत (२५) व मुलगा कृष्णांश (१) हे सटाणा येथून वाळूजकडे जात होते.

सोमवारी सकाळी ८ वाजता मोटारसायकलला (एमएच २० सीक्यू ० ७६६) वरखेड पाटीजवळ समोरुन भरधाव वेगाने येणाऱ्या स्कॉ र्पिओने (एम.एच.१९ बी. यू.४२१४) समोरासमोर जोरदार धडक दिली. मोटारसायकलने जाणारे तिघेही हवेत फेकले गेले व रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात पडले.

घटनेची माहिती मिळताच १०८ च्या रुग्णवाहिकेतून जखमींना गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल सूर्यवंशी आणि डॉ. मुजम्मिल शेख यांनी तपासून तिघांनाही मृत घोषित केले. घटनेची महिती मिळताच शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे बीट जमादार विनोद बिघोत यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

दोन्ही अपघातग्रस्त वाहने पोलीस ठाण्यात जमा केली असून, पुढील तपास शिल्लेगाव पोलीस करीत आहेत. दाम्पत्य व चिमुकल्याचा अपघातात मृत्यू झाल्याने गंगापूर व वैजापूर तालुक्यांत हळहळ व्यक्त केली जात आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

नवदाम्पत्याने वादातून संपवले जीवन ! संगमनेरमध्ये खळबळ नवदाम्पत्याने वादातून संपवले जीवन ! संगमनेरमध्ये खळबळ
पठार भागातील सख्ख्या चुलत बहिणींच्या आत्महत्येची घटना ताजी असतानाच संगमनेर शहरातील इंदिरानगर परिसरात एका नवदाम्पत्याने आत्महत्या केल्याच्या घटनेने संगमनेरमध्ये खळबळ...
कोल्हापूर जिल्ह्यात ‘कोल्हापूर गॅझेटियर’ त्वरित लागू करा; मराठा महासंघाची मागणी
सावधान! अशी परिस्थिती कुठल्याही देशात होऊ शकते; नेपाळमधील अराजकतेवरून संजय राऊत यांचा इशारा
Sindhudurg News – भूमी अभिलेख कार्यालयाने नागरिकांची कामे वेळेत पूर्ण करावीत, अन्यथा…; वैभव नाईक यांचा आंदोलनाचा इशारा
महादेवपुरा मतदारसंघाप्रमाणे चंद्रपुरातील राजुरामध्येही मतचोरी, एक महिन्यात कारवाई करा अन्यथा न्यायालयात दाद मागू – अतुल लोंढे
जनसुरक्षा कायद्याविरोधात महाराष्ट्रात उद्या राज्यव्यापी आंदोलन, शिवसेनाही होणार सहभागी
लडाखमधील सियाचीन ग्लेशियरमध्ये हिमस्खलन, तीन जवानांना वीरमरण