नेपाळमधील हिंसाचारावर मनीषा कोईरालाची भावनिक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

नेपाळमधील हिंसाचारावर मनीषा कोईरालाची भावनिक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

नेपाळ सध्या हिंसाचाराच्या आगीत जळत आहे. यामागील कारण सोशल मीडिया आहे. प्रत्यक्षात नेपाळच्या ओली सरकारने फेसबुक, इंस्टाग्रामसह अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली आहे. याच्या निषेधार्थ, Gen-Z म्हणजेच १८ ते २८ वयोगटातील तरुण रस्त्यावर उतरले. यानंतर देशातील अनेक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात तोडफोड आणि जाळपोळ झाली आहे. यावरच आधारीत बॉलिवूडमधील अभिनेत्री मनीषा कोइरालाने एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेत्री मनीषा कोइरालाने तिच्या इंस्टाग्रामवर रक्ताने माखलेल्या बुटाचा भावनिक फोटो शेअर केला आणि देशाला हादरवून टाकणाऱ्या या संकटावर एक तीव्र संदेशही दिला. अभिनेत्रीने नेपाळी भाषेत लिहिले, ‘आजको दिन नेपाल का लागी कालो दिन हो – जब जनताको आवाज, भ्रष्टचारवृध्दको आक्रोश रा न्यायको मगलाई गोलीले जवाफ दियो. म्हणजेच आज नेपाळसाठी काळा दिवस आहे – जेव्हा लोकांच्या आवाजाला, भ्रष्टाचाराविरुद्धच्या रागाला आणि न्यायाच्या मागणीला गोळ्यांनी उत्तर दिले जाते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manisha Koirala (@m_koirala)

मनीषा कोईरालाचा जन्म १६ ऑगस्ट १९७० रोजी नेपाळची राजधानी काठमांडू येथे झाला होता. अभिनेत्रीचे आजोबा विश्वेश्वर प्रसाद नेपाळचे पंतप्रधान राहिले आहेत आणि वडील प्रकाश कॅबिनेट मंत्री होते. १९८९ मध्ये मनीषाने ‘फेरी भेटौला’ या नेपाळी चित्रपटातून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर मनीषाने सुभाष घई यांच्या सौदागर या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यासोबतच, मनीषा वेश्याव्यवसाय आणि नेपाळी मुलींची तस्करी रोखण्यासाठीही काम करत आहे.

नेपाळच्या ओली सरकारने फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप, ट्विटर (एक्स) यासह अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली आहे. नेपाळच्या कंपनी कायद्यानुसार या कंपन्यांनी देशात स्वतःची नोंदणी केलेली नसल्यामुळे सरकारने हे पाऊल उचलले आहे. पंतप्रधान ओली यांच्या सरकारने याला राष्ट्रीय सुरक्षा आणि नियमनाचा विषय म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

नवदाम्पत्याने वादातून संपवले जीवन ! संगमनेरमध्ये खळबळ नवदाम्पत्याने वादातून संपवले जीवन ! संगमनेरमध्ये खळबळ
पठार भागातील सख्ख्या चुलत बहिणींच्या आत्महत्येची घटना ताजी असतानाच संगमनेर शहरातील इंदिरानगर परिसरात एका नवदाम्पत्याने आत्महत्या केल्याच्या घटनेने संगमनेरमध्ये खळबळ...
कोल्हापूर जिल्ह्यात ‘कोल्हापूर गॅझेटियर’ त्वरित लागू करा; मराठा महासंघाची मागणी
सावधान! अशी परिस्थिती कुठल्याही देशात होऊ शकते; नेपाळमधील अराजकतेवरून संजय राऊत यांचा इशारा
Sindhudurg News – भूमी अभिलेख कार्यालयाने नागरिकांची कामे वेळेत पूर्ण करावीत, अन्यथा…; वैभव नाईक यांचा आंदोलनाचा इशारा
महादेवपुरा मतदारसंघाप्रमाणे चंद्रपुरातील राजुरामध्येही मतचोरी, एक महिन्यात कारवाई करा अन्यथा न्यायालयात दाद मागू – अतुल लोंढे
जनसुरक्षा कायद्याविरोधात महाराष्ट्रात उद्या राज्यव्यापी आंदोलन, शिवसेनाही होणार सहभागी
लडाखमधील सियाचीन ग्लेशियरमध्ये हिमस्खलन, तीन जवानांना वीरमरण