अकरावीचे दोन लाख विद्यार्थी प्रवेशाविना, आता विशेष फेरी

अकरावीचे दोन लाख विद्यार्थी प्रवेशाविना, आता विशेष फेरी

राज्यभरातील 9 हजार 528 महाविद्यालयांमध्ये एकूण 21 लाख 54 हजार 692 जागा उपलब्ध असूनही आतापर्यंत फक्त 12 लाख विद्यार्थ्यांनीच प्रवेश निश्चित केला आहे. 14.71 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून त्यापैकी 2 लाख विद्यार्थी अद्याप प्रवेशापासून वंचित आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाने 11वी प्रवेशासाठी अंतिम विशेष फेरीचे आयोजन केले आहे.

23 ऑगस्ट सायंकाळी 6 पर्यंत नवीन नोंदणी करता येईल. 25 ऑगस्टला रिक्त जागांची यादी जाहीर केली जाईल. त्यानंतर 26 ते 27 ऑगस्टदरम्यान नोंदणीसह अर्जात सुधारणा करता येणार आहे. यामध्ये राज्य मंडळाच्या पुरवणी परीक्षेत (ATKT) उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठीही प्रवेश घेण्याची संधी आहे. अर्जाचा भाग-2 देखील याच कालावधीत भरता येईल.

अशी असेल विशेष फेरी

या विशेष फेरीत विद्यार्थ्यांना 1 ते 10 पर्यंत विद्यालयांची पसंतीक्रम यादी देता येईल. 29 ऑगस्ट रोजी प्रवेशपत्रे पोर्टलवर प्रसिद्ध केली जातील. त्याच दिवशी Student व College Login मध्ये तपशील दिसणार असून विद्यार्थ्यांना SMS द्वारेही प्रवेशाची माहिती दिली जाईल. 29 ते 30 ऑगस्टदरम्यान विद्यार्थ्यांनी संबंधित विद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

राज्यातील होमिओपॅथी डॉक्टरांना दिलासा, सीसीएमपी कोर्स केलेल्या डॉक्टरांची एमएमसीमध्ये नोंद होणार राज्यातील होमिओपॅथी डॉक्टरांना दिलासा, सीसीएमपी कोर्स केलेल्या डॉक्टरांची एमएमसीमध्ये नोंद होणार
राज्यातील होमिओपॅथी डॉक्टरांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने सीसीएमपी अर्थात सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकोलॉजी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या डॉक्टरांची...
धुवाधार पावसाने ठाणे, पालघरकरांना झोडपले; हवामान विभागाचा रेड अलर्ट
नातवासोबत घट्ट नाते असले तरी आजी पालकांपेक्षा श्रेष्ठ नाही, हायकोर्टाचा आई-वडिलांना दिलासा
भक्तीचा महासागर लोटणार! लाडक्या गणरायाला आज निरोप, कडेकोट बंदोबस्त… 18 हजार पोलीस तैनात, 10 हजार कॅमेरे, ड्रोनचीही नजर
मराठा आरक्षणाच्या जीआरचा वाद संपेना, भाजपने आपला डीएनए लक्षात ठेवावा; भुजबळांचा इशारा… आता कोर्टात जाण्याशिवाय पर्याय नाही
विसर्जनाला जाताय… हे लक्षात असू द्या!
मुंबईवर आत्मघाती हल्ल्याची धमकी, 34 वाहनांमध्ये 34 मानवी बॉम्ब… 400 किलो; आरडीएक्स पेरल्याचा दावा, पोलिसांकडून कसून तपास