हिरवा मटार खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे, वाचा

हिरवा मटार खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे, वाचा

हिवाळ्याची चाहूल लागताच बाजारात विविध प्रकारच्या भाज्या दिसू लागतात. म्हणूनच या ऋतूमध्ये मिळणाऱ्या विविध भाज्या अन्नाची चव तर वाढवतातच, शिवाय या भाज्या आपल्या आरोग्यासाठी सुद्धा तितक्याच फायदेशीर आहेत. त्यापैकी एक भाजी म्हणजे हिरवे वाटाणे. हिरवे वाटाणे खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. जाणून घेऊया हिरवे मटाणे खाण्याचे फायदे.

ब्रोकोली खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे, वाचा

मधुमेहाच्या रुग्णांसाठी हिरवे वाटाणे खूप फायदेशीर आहेत. त्याचा जीआय कमी असतो. यामुळे साखर नियंत्रित करण्यास मदत होते.

हिरवे वाटाणे हे पोषक तत्वांचे भांडार आहे. त्यात व्हिटॅमिन-सी, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि कॅल्शियम सारखे पोषक घटक असतात. हे घटक आपल्या हृदयाच्या आरोग्याला प्रोत्साहन देतात. वाटाण्यामध्ये विरघळणारे फायबर देखील आढळते. यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी सामान्य होते. त्यामुळे तुम्ही हृदयरोग टाळू शकता.

मधुमेह नियंत्रणासाठी ‘हा’ गर ठरेल बहुमोली, वाचा

 

हिरवे वाटाणे फायबरने समृद्ध असतात. यामुळे पचनाशी संबधित समस्यांपासून आपले रक्षण होते. हिवाळ्यात दररोज हिरवे वाटाणे खाल्ले तर, आपल्या आतड्यांमध्ये चांगले बॅक्टेरिया विकसित होतात. त्यामुळे जळजळ आणि पोटाच्या इतर समस्या टाळता येतात.

शरीरात लोहाच्या कमतरतेमुळे थकवा, अशक्तपणा आणि अनेक समस्या उद्भवतात. अशा परिस्थितीत आहारात हिरव्या वाटाण्यापासून बनवलेले पदार्थ समाविष्ट केले पाहिजेत. शाकाहारी लोकांसाठी ते लोहाचा चांगला स्रोत आहे.

हिरव्या वाटाण्यामध्ये लोह, फोलेट, व्हिटॅमिन ए, फॉस्फरस देखील असतात, जे स्नायूंच्या बळकटीला प्रोत्साहन देतात.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

तिहेरी हत्याकांडाचा तपास डिवायएसपींकडे, आरोपींना 8 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी तिहेरी हत्याकांडाचा तपास डिवायएसपींकडे, आरोपींना 8 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी
दुर्वास पाटील याने केलेल्या तिहेरी हत्याकांडचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश माईणकर यांच्याकडे सपुर्द करण्यात आला आहे.हत्याकांडातील चार आरोपीना ८...
पावसाळ्यात डेंग्यूपासून बचावासाठी काय करावं? जाणून घ्या तज्ञांचे मत….
न्या. चंद्रशेखर यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती पदाची घेतली शपथ
नगरपालिका निवडणुकांसाठी EVM ऐवजी मतपत्रिकेचा वापर करा, कर्नाटक मंत्रिमंडळाची राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी
चुकीच्या पद्धतीने GST लागू केला, आता माफी मागण्याऐवजी गर्विष्ठपणे भेट दिल्याची जाहिरात करताय; आदित्य ठाकरे यांचा टोला
मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारे अभिनेते आशिष वारंग यांचं निधन
SA Vs ENG – दक्षिण आफ्रिकेने 27 वर्षांनी इंग्लंडचं मैदान मारलं, फक्त 5 धावांनी केलं चितपट