कर्जतमध्ये जलविद्युत प्रकल्पासाठी जमिनी बळकावण्याचा डाव; कन्सल्टंट कंपनी, दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

कर्जतमध्ये जलविद्युत प्रकल्पासाठी जमिनी बळकावण्याचा डाव; कन्सल्टंट कंपनी, दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

कर्जत तालुक्यातील गौरकामत येथे टॉरेंट पीएसएच ३ प्रा. लि. कंपनी जलविद्युत प्रकल्प उभारणार आहे. मात्र शेतकऱ्यांना विश्वासात न घेताच या प्रकल्पासाठी जागा बळकावण्याचा डाव असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. गौरकामत येथे आज झालेल्या पर्यावरणीय जनसुनावणीत शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत पर्यावरणासंदर्भात खोटा अहवाल सादर करणाऱ्या कन्सल्टंट कंपनी आणि दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी केली आहे.

कर्जत तालुक्यातील पाली ग्रामपंचायत हद्दीतील साईडोंगर व पाली, वदप ग्रामपंचायत हद्दीतील ढाक, पोटल ग्रामपंचायत हद्दीतील पोटल व आंबोट आणि भालिवडी ग्रामपंचायत हद्दीतील भालिवडी या ठिकाणी ३००० मेगावॅट पंप स्टोरेज जलविद्युत प्रकल्प प्रस्तावित आहे. यासाठी २३३ हेक्टर क्षेत्र बाधित होणार असून पाली आणि ढाक या दोन ठिकाणी दोन जलाशयांची निर्मिती केली जाणार आहे. ढाक डोंगर-माथ्यावर २७ मीटर उंचीचे धरण बांधण्यात येणार आहे, तर पाली येथील पेज नदीवर ५९ मीटर उंचीचे धरण बांधण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या उदंचन प्रकल्पासाठी सुमारे १३,०१७ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. मात्र या प्रकल्पाला स्थानिकांनी जोरदार विरोध केला आहे.

अहवालात जंगलाऐवजी ‘झुडपे’ दाखवले

तहसीलदार धनंजय जाधव व प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी ऋतुजा भालेराव यांच्या उपस्थितीत झालेल्या सुनावणीत शेतकऱ्यांनी प्रशासनावर हल्ला चढवला. पश्चिम घाट हा इको सेन्सेटिव्ह झोन असतानाही अहवालात जंगलाऐवजी ‘झुडपे’ दाखवले गेले आहेत. ही थेट जनतेची फसवणूक आहे. येथे ४०० हून अधिक पक्ष्यांच्या जाती, सरपटणारे प्राणी आणि महाराष्ट्राचा राज्यप्राणी शेकरू आढळतो, पण कन्सल्टंट अहवालात त्याचा उल्लेख नाही. प्रशासन व कंपनी संगनमताने ग्रामस्थांच्या जमिनी व हक्कांवर गदा आणत आहेत. त्यामुळे कन्सल्टंटवर गुन्हा दाखल करा अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

तिहेरी हत्याकांडाचा तपास डिवायएसपींकडे, आरोपींना 8 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी तिहेरी हत्याकांडाचा तपास डिवायएसपींकडे, आरोपींना 8 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी
दुर्वास पाटील याने केलेल्या तिहेरी हत्याकांडचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश माईणकर यांच्याकडे सपुर्द करण्यात आला आहे.हत्याकांडातील चार आरोपीना ८...
पावसाळ्यात डेंग्यूपासून बचावासाठी काय करावं? जाणून घ्या तज्ञांचे मत….
न्या. चंद्रशेखर यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती पदाची घेतली शपथ
नगरपालिका निवडणुकांसाठी EVM ऐवजी मतपत्रिकेचा वापर करा, कर्नाटक मंत्रिमंडळाची राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी
चुकीच्या पद्धतीने GST लागू केला, आता माफी मागण्याऐवजी गर्विष्ठपणे भेट दिल्याची जाहिरात करताय; आदित्य ठाकरे यांचा टोला
मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारे अभिनेते आशिष वारंग यांचं निधन
SA Vs ENG – दक्षिण आफ्रिकेने 27 वर्षांनी इंग्लंडचं मैदान मारलं, फक्त 5 धावांनी केलं चितपट