कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या करून पतीने जीवन संपवले, अहिल्यानगरमध्ये खळबळ

कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या करून पतीने जीवन संपवले, अहिल्यानगरमध्ये खळबळ

कौटुंबिक भांडणातून पत्नीची हत्या करून पतीने देखील गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात चासनळी गावात शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी कोपरगाव पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे. पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.

दिलीप शंकर मिजगुले (60) आणि स्वाती मिजगुले (54) अशी मयत पती-पत्नीची नावे आहेत. दिलीप यांचा चहाचा व्यवसाय होता तर स्वाती या अंगणवाडी सेविका आहेत. पत्नीची उशीने तोंड दाबून हत्या केल्यानंतर पतीने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली.

सकाळपासून घराचा दरवाजा बंद असल्याने शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी खिडकीतून आत डोकावले असता घरातील दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. तात्काळ ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच शिर्डी उपविभागीय अधिकारी अमोल भारती यांच्यासह कोपरगाव तालुका पोलीस निरीक्षक संदीप कोळी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

मृत्यूपूर्वी दिलीप यांनी घरातील भिंतीवर काहीतरी मॅसेज लिहून ठेवला आहे. मात्र नेमके काय लिहिले आहे हे तपासानंतर स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवले. पुढील तपास कोपरगाव पोलीस करत आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

राज्यातील होमिओपॅथी डॉक्टरांना दिलासा, सीसीएमपी कोर्स केलेल्या डॉक्टरांची एमएमसीमध्ये नोंद होणार राज्यातील होमिओपॅथी डॉक्टरांना दिलासा, सीसीएमपी कोर्स केलेल्या डॉक्टरांची एमएमसीमध्ये नोंद होणार
राज्यातील होमिओपॅथी डॉक्टरांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने सीसीएमपी अर्थात सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकोलॉजी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या डॉक्टरांची...
धुवाधार पावसाने ठाणे, पालघरकरांना झोडपले; हवामान विभागाचा रेड अलर्ट
नातवासोबत घट्ट नाते असले तरी आजी पालकांपेक्षा श्रेष्ठ नाही, हायकोर्टाचा आई-वडिलांना दिलासा
भक्तीचा महासागर लोटणार! लाडक्या गणरायाला आज निरोप, कडेकोट बंदोबस्त… 18 हजार पोलीस तैनात, 10 हजार कॅमेरे, ड्रोनचीही नजर
मराठा आरक्षणाच्या जीआरचा वाद संपेना, भाजपने आपला डीएनए लक्षात ठेवावा; भुजबळांचा इशारा… आता कोर्टात जाण्याशिवाय पर्याय नाही
विसर्जनाला जाताय… हे लक्षात असू द्या!
मुंबईवर आत्मघाती हल्ल्याची धमकी, 34 वाहनांमध्ये 34 मानवी बॉम्ब… 400 किलो; आरडीएक्स पेरल्याचा दावा, पोलिसांकडून कसून तपास