उद्योगनगरीची वर्षभराची चिंता मिटली; पवना धरणातील पाणीसाठा 98 टक्के; विसर्ग सुरू

उद्योगनगरीची वर्षभराची चिंता मिटली; पवना धरणातील पाणीसाठा 98 टक्के; विसर्ग सुरू

पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण परिसरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे ९८ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे शहरवायीयांच्या वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली आहे. सोमवारी धरण परिसरात पावसाचा जोर वाढल्यामुळे १४०० क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तसेच पावसाचा अंदाज घेऊन विसर्ग कमी किंवा जास्त करण्यात येणार असल्याची माहिती शाखा अभियंता रजनीश बरिया यांनी दिली. विसर्ग सुरू झाल्यामुळे प्रशासनही ‘अलर्ट’ झाले आहे.

यंदा उन्हाळा कडक होता. त्यामुळे धरणातील पाणीसाठा २४ टक्क्यांवर आला होता. मात्र, पावसाने मे महिन्याच्या २० तारखेनंतर पिंपरी- चिंचवडसह मावळात दमदार सुरुवात केली. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांनंतर यंदा २४ जूनलाच धरणातील पाणीसाठा ५० टक्के झाला होता. ऑगस्टमध्ये धरण परिसरात कोसळणाऱ्या पवना धरणात ९८ टक्के पाणीसाठा झाला आहे. पुणे जिल्हा तथा घाटमाथा परिसरात हवामान विभागाने ‘रेड अलर्ट’ दिला आहे. त्यामुळे धरणात पाण्याचा येवा वाढत आहे. सोमवारी दुपारी दोन वाजता १४०० क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तसेच पावसाचा अंदाज घेऊन विसर्ग कमी किंवा जास्त करण्यात येणार आहे. श्रावणसरींमुळे धरणातील पाणीसाठा ९५ टक्यांवर गेला. मागील दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. त्यामुळे पवना धरणातील पाणीसाठा ९८ टक्क्यांवर गेला आहे.

१९२१ मि.मी. पावसाची नोंद
पवना धरण दरवर्षी १५ ऑगस्टपूर्वी १०० टक्के भरत असते. यंदा मात्र जुलै महिन्यात धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. जून महिन्यापासून धरण परिसरात १९२१ मि.ली. मीटर पावसाची नोंद झाली आहे.
– रजनीश बरिया, शाखा अभियंता, पवना धरण

शहरात दिवसभर पाऊस
सोमवारी दिवसभर झालेल्या संततधारेमुळे शहरातील रस्ते जलमय झाले होते. साचलेल्या पाण्यातून वाहनचालक, नागरिकांना वाट काढताना कसरत करावी लागली. शहरातील पिंपरी, चिंचवड, भोसरी, मोशी, निगडी, आकुर्डी, पिंपळे गुरव, पिंपळे निलख, सांगवी, वाकड, ताथवडे, पुनावळे या सर्वच भागांत पाऊस झाला. अनेक ठिकाणी सखल भागांत पाणी साचले होते. पुणे-मुंबई महामार्गावर एका बाजूने महामेट्रो आणि दुसऱ्या बाजूने अर्बन स्ट्रीट, जलवाहिनीचे काम सुरू आहे. या कामामुळे ठिकठिकाणी खोदाई करण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावर मोठे खड्डेही पडले आहेत. निगडीतील टिळक चौक ते बजाज ऑटोपर्यंतच्या मार्गावर पाणी साचले होते. यातून वाहन चालविताना चालकांना मोठी कसरत करावी लागली. यामुळे वाहतूक संथ होऊन कोंडी झाली होती. शहरात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. कोठेही घरात पाणी शिरले नाही. सखल भागांत साचलेल्या पाण्याचा तातडीने निचरा केल्याचे महापालिकेचे आपत्तिव्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल यांनी सांगितले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;