शेतकऱ्यांच्या मतांची भीती वाटली पाहिजे ! शेतकरी हक्क परिषदेत एल्गार; कर्जमाफीवर रान पेटविणार

शेतकऱ्यांच्या मतांची भीती वाटली पाहिजे ! शेतकरी हक्क परिषदेत एल्गार; कर्जमाफीवर रान पेटविणार

आपल्या देशात जाती-धर्माची लढाई भडकल्यावर मतांवर परिणाम होतो; परंतु हक्कांसाठीच्या लढाईचा मतांवर परिणाम होत नाही. त्यामुळेच सरकारला शेतकरी आंदोलनाची भीती वाटेनाशी झाली आहे. सरकारला शेतकऱ्यांच्या मतांची भीती वाटली पाहिजे, यासाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कर्जमाफीच्या विषयावर रान पेटवावे लागेल, असा एल्गार शेतकरी हक्क परिषदेत केला.

राज्यातील शेतकरी संघटना आणि शेतीशी संबंधित संस्था आणि राजकीय पक्ष प्रतिनिधींच्या पुढाकाराने आयोजित शेतकरी हक्क परिषदेत आजी-माजी लोकप्रतिनिधींसह राज्यभरातील विविध शेतकरी व सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शेतकरी व्यापक जनआंदोलन उभारण्याची भूमिका घेतली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिषदेला प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू, आमदार कैलास पाटील, बाळासाहेब देशमुख, शेतकरी नेते अजित नवले, अनिल घनवट, पत्रकार रमेश जाधव, शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष, आम आदमी पार्टी यांच्यासह अनेक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बच्चू कडू म्हणाले, ‘राज्यात 25 ते 30 लाख शेतकरी कर्जबाजारी आहेत. रोज 10 ते 15 आत्महत्या होत आहेत. शेतमालाचे दर सातत्याने घसरत आहेत. मात्र, सरकार आंदोलकांवर गुन्हे दाखल करून आंदोलने बदनाम केली जात आहेत. जाती-धर्माच्या राजकारणात शेतकरी चळवळीची मशाल कायम तेवत राहिली पाहिजे.’ आमदार कैलास पाटील म्हणाले, ‘सरकारची शेतकऱ्यांबद्दलची भूमिका दुटप्पीपणाची आहे. कर्जमाफीबद्दल जाहीरनाम्यामध्ये उल्लेख करून आता दर पाच वर्षांनी कर्जमाफी द्यायची की नाही? असा प्रश्न सत्ताधारी उपस्थित करीत आहेत.’

ट्रम्पच्या दादागिरीला हिंदुस्थानींनी बळी पडू नये !

‘अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयातकर लावण्याची घोषणा केली असून, आपली 56 इंची छाती 22 इंची होऊन तेथील दुग्धजन्य पदार्थ, मका, सोयाबीनसाठी आपली बाजारपेठ खुली केल्यास शेतकऱ्यांना मोठा फटका बसेल. ट्रम्पच्या दादागिरीला हिंदुस्थानींनी बळी पडू नये. शेतकऱ्यांनीदेखील त्यासाठी एकजूट दाखवावी,’ असे आवाहन राजू शेट्टी यांनी केले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;