मुंबई, ठाणे, पालघरमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; रायगड आणि रत्नागिरीसाठी ऑरेंज अलर्ट

मुंबई, ठाणे, पालघरमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; रायगड आणि रत्नागिरीसाठी ऑरेंज अलर्ट

गेल्या काही दिवसांत मुंबईत पावसाने विश्रांती घेतली होती. पण आता पुढील काही दिवसांत पाऊस जोरदार कमबॅक करणार आहे. येत्या काही दिवसांत मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने गुरुवार, शनिवारी व रविवारी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला असून, गुरुवारपासून रविवारीपर्यंत ‘मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा’ इशारा दिला आहे.

गेल्या काही दिवसांत मुंबईत पावसाने ओढ दिल होती. पण बुधवारी बुधवारी सकाळपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत राहिला. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार कुलाबा वेधशाळेत मंगळवार ते बुधवार सकाळपर्यंत 7 मिमी, तर सांताक्रूझमध्ये 4 मिमी पावसाची नोंद झाली होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;