मुंबई, ठाणे, पालघरमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; रायगड आणि रत्नागिरीसाठी ऑरेंज अलर्ट
गेल्या काही दिवसांत मुंबईत पावसाने विश्रांती घेतली होती. पण आता पुढील काही दिवसांत पाऊस जोरदार कमबॅक करणार आहे. येत्या काही दिवसांत मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने गुरुवार, शनिवारी व रविवारी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला असून, गुरुवारपासून रविवारीपर्यंत ‘मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा’ इशारा दिला आहे.
गेल्या काही दिवसांत मुंबईत पावसाने ओढ दिल होती. पण बुधवारी बुधवारी सकाळपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत राहिला. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार कुलाबा वेधशाळेत मंगळवार ते बुधवार सकाळपर्यंत 7 मिमी, तर सांताक्रूझमध्ये 4 मिमी पावसाची नोंद झाली होती.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List