Cooking Tips – कारल्याची भाजी अशापद्धतीने कराल, तर घरातील सर्वजण आनंदाने खातील, वाचा

Cooking Tips – कारल्याची भाजी अशापद्धतीने कराल, तर घरातील सर्वजण आनंदाने खातील, वाचा

कारलं तुपात घोळा नाहीतर साखरेत घोळा कारलं कडू ते कडूच राहणार ही म्हण आपण खूप लहानपणापासून ऐकली आहे. आपल्या आरोग्यासाठी हिरव्या भाज्या या खूप गरजेच्या आहेत. या भाज्यांमधील एक नाव म्हणजे कारलं. परंतु कारलं म्हटल्यावर अनेकजण नाक मुरडतात. अशावेळी आपण कारल्याची भाजी करण्यासाठी टाळाटाळ करतो. घरामध्ये कुणीही कारल्याची भाजी खात नसेल तर, आता मात्र या काही महत्त्वाच्या टिप्स तुम्ही फाॅलो केल्या तर कारल्याची भाजी घरातील मंडळी चाटून पुसून खातील.

कोणताही पदार्थ करताना, गृहिणीची खऱ्या अर्थाने कसरत असते. घरातील सर्वजणांना आवडेल की नाही याचा विचार गृहिणी करतात. परंतु काही महत्त्वाच्या टिप्स आपण अंमलात आणल्या तर, कारल्याची भाजीही तितकीच चविष्ट होईल.

कारल्याची चव ही कडू असल्यामुळे, आपण ती खाण्यासाठी फार उत्सुक नसतो. परंतु याच भाजीचे आरोग्याच्या दृष्टीने मात्र भरमसाठ उपयोग आहेत. कारल्याची भाजी खाल्ल्यामुळे मधुमेहासारख्या आजारांपासून दूर राहता येते.

कारल्याची भाजी करताना या टिप्स वापरा

 

  • कारल्याच्या भाजीमध्ये चिंचेचा वापर केल्यास, कारल्याची भाजी अतिशय चविष्ट होते. तसेच कारल्याच्या चवीमध्येही खूप फरक पडतो. चिंचेचा कोळ करुन घातल्यास, कारल्याची भाजी न करुन खाणारेही बोटं चाटून खातील.

  • कारल्याच्या भाजीमध्ये शेंगदाण्याचे कूट घातल्यास, कारल्याच्या भाजीचा कडवटपणा खूप मोठ्या प्रमाणात कमी होतो.

  • कारल्याच्या भाजीमध्ये गूळाचा छोटा खडा घातल्यास, कारल्याच्या भाजीला सुंदर चव येते. यामुळे कारल्याचा कडूपणा बऱ्याच अंशी कमी होतो.

  • कारल्याच्या भाजीमध्ये सुके खोबरे, जिरे, तीळ यांचे दरदरीत वाटण घालून भाजी केल्यास, भाजी अधिक चविष्ट होते.

  • कारल्याच्या भाजीमध्ये ओले खोबरे घातल्याने, भाजीचा कडवटपणा अर्धाअधिक निघून जातो.

  • कारल्याच्या भाजीमध्ये तीळ, जीरे, कोथिंबीर, आलं, लसूण यांची फोडणी दिल्यामुळे, भाजीचा कडवटपणा निघून जातो.

  • कांद्याचा अधिक वापर केल्यामुळे, कारल्याची चव अधिक वाढते. त्यामुळे भाजीचा कडवटपणाही निघून जातो.

  • कारली चिरुन झाल्यानंतर, कारल्याला थोडेसे मीठ लावून ठेवल्यास कारल्याचा कडवटपणा निघून जातो. मीठ लावून ठेवल्यावर, कारल्याला पाणी सुटते. नंतर हे पाणी काढून टाकून कारल्याची भाजी करावी.

फक्त एक महिना ‘ही’ भाजी खाल तर वर्षभर निरोगी राहाल, अनेक आजारांवर गुणकारी

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;