उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे हाहाःकार, हजारो हेक्टरवरील पिकं झाली आडवी

उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे हाहाःकार, हजारो हेक्टरवरील पिकं झाली आडवी

वादळ आणि अवकाळी पावसामुळे उत्तर महाराष्ट्रातील हजारो हेक्टरवरच्या पिकांचे नुकसान झाले आहे. या वादळी पावसामुळे 33 हजारहून अधिक शेतकऱ्यांना फटका बसला आहे.

5 मे ते 13 मे दरम्यान उत्तर महाराष्ट्रात जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला. या पावसामुळे नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यातील 16 हजार 985 हेक्टरवली पीकं आडवी झाली आहे. दीड हजार गावातील 33 हजार 400 शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार जळगाव जिल्ह्यात 9 हजार 806 हेक्टरवर सर्वाधिक नुकसान झाले आहे. त्यात केळी, कांदा, मका, पपई, ज्वारी, बाजरी या पिकांचा समावेश आहे.

6 हजार 100 हेक्टरवरील केळी, 950 हेक्टरवरील मका आणि 400 हेक्टरवरील पपईचे या पावसात नुकसान झाले आहे. जळकवानंतर सर्वाधिक नुकसान नाशिक जिल्ह्यात झाले असून एकूण 4 हजार 803 हेक्टरवरील पिकं आडवी झाली आहेत. नाशकात दोन हजार हेक्टरवरील कांदा, 400 हेक्टरवरील आंब्यांचे नुकसान झाले आहे. नाशिकमधील 775 जिल्ह्यातील 17 हजार शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तर धुळे जिल्ह्यात 2 हजार 3
48 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी अवकाळीग्रस्त गावांना भेटी दिल्या आणि नुकसानीचा आढावा घेतला. तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी सरकारडे पंचनामा करून मदतीची मागणी केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

न्यायालयातच पीडितेला प्रपोज, बलात्काराच्या आरोपीची शिक्षा स्थगित; नेमकं प्रकरण काय? न्यायालयातच पीडितेला प्रपोज, बलात्काराच्या आरोपीची शिक्षा स्थगित; नेमकं प्रकरण काय?
सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी एका प्रेमाची दुसरी गोष्ट पहायला मिळाली. लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी असलेल्या आरोपीने न्यायालयात पीडितेला...
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? सुनील तटकरेंचे एक घाव दोन तुकडे, स्पष्टच सांगितलं..
लग्न, फसवणुक आणि षडयंत्र; इंटीमेट सीन्सचा भडीमार आहे या सिनेमांमध्ये
बीडीडी पुनर्विकास प्रकल्पातील घरांचा ताबा देण्यास विलंब का होतोय? आदित्य ठाकरे यांचा म्हाडाला सवाल
रिसॉर्टमधील तंबू कोसळून पर्यटक तरुणीचा मृत्यू, तीन जण जखमी
भरधाव ट्रकची कारला धडक, एकाच कुटुंबातील 5 जण ठार; 8 गंभीर जखमी
अभिनेता गोविंदाची डाळिंब,आंब्याच्या फळबांगाना भेट; शेतकऱ्याचं केलं कौतुक तर गावकऱ्यांशी गप्पा