India Pakistan War – युद्ध नको, शांतता हवी! हिंदुस्थानने तांडव सुरू करताच पाकिस्तानची टरकली, उपपंतप्रधानांची भाषा बदलली

India Pakistan War – युद्ध नको, शांतता हवी! हिंदुस्थानने तांडव सुरू करताच पाकिस्तानची टरकली, उपपंतप्रधानांची भाषा बदलली

हिंदुस्थान आणि पाकिस्तान दरम्यान वाढत्या संघर्षात पाकिस्तानचे उपपंपतप्रधान आणि  परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी मोठे विधान केले आहे. हिंदुस्थान जर थांबणार असेल तर आम्हीही हल्ले थांबवू असे डार म्हणाले. तसेच पाकिस्तानला आणखीन विनाश नकोय असेही डार म्हणाले.

एबीपी न्युजने याबाबत वृत्त दिले आहे. डार हे पाकिस्तानच्या जियो न्युजशी बोलताना म्हणाले की आम्हालाही अजून फार नुकसान नकोय. आम्हाला विनाश नकोय आणि संपत्तीचे वाया घालवयची नाहिये. पाकिस्तानला नेहमची शांतता हवी होती. जर हिंदुस्थान थांबणार असेल तर आम्हीही शांततेचा विचार करू आणि प्रत्युत्तराची कुठलीही कारवाई करणार नाही. वास्तवात आम्हालाही शांतता हवी आहे असेही डार म्हणाले.


पाकिस्तानकडून 26 ठिकाणी हल्ले

शुक्रवारी पाकिस्तानने हिंदुस्थानात 26 ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्याला हिंदुस्थानी सैन्याने जोरदार उत्तर दिले. हिंदुस्थानी सैन्याने सांगितले की प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी पाकिस्तानने सीमावर्ती भागातला आपला एअरस्पेस बंद केलेला नाही आणि नागरी विमानांवर त्यांनी बंदी आणलेली नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

भारत -पाकिस्तानमध्ये तणाव, मुंबई पोलिसांचा मोठा निर्णय; आता या गोष्टींवर बंदी भारत -पाकिस्तानमध्ये तणाव, मुंबई पोलिसांचा मोठा निर्णय; आता या गोष्टींवर बंदी
पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला होता, या हल्ल्यामध्ये 26 जणांना आपला जीव गमवावा लागला, यामध्ये 25 भारतीय तर एका नेपाळी...
लग्नाआधीच प्रेग्नंट,बाळाला स्वीकारण्यास बॉयफ्रेंडचा नकार; अखेर बॉलिवूड अभिनेत्रीने केलं अबॉर्शन,कंगनाने दिला धीर
‘तुझ्या मुस्लिम नवऱ्याला सोडून दे’, पाकिस्तानी युजरच्या कमेंटवर अभिनेत्रीचा संताप, म्हणाली ‘पाळलेले दहशतवादी…’
नाना पाटेकर यांनी ब्रेक दिला आणि… ; विक्रम गायकवाडांबद्दल काय म्हणाले?
सकाळी की संध्याकाळी… मधुमेहाच्या रुग्णाने कारल्याचा रस कधी प्यावा?
उच्च रक्तदाबावर रामबाण अस्त्र; पतंजली बीपी ग्रिट वटीचा फायदा जाणून घ्या
India Pak War – हिंदुस्थान-पाकिस्तान शस्त्रसंधीसाठी तयार, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा