हिंदुस्थाननं जिरवली, तरी पाकिस्तानला युद्धाची खुमखुमी; सैन्य LoC वर आणण्यास सुरुवात, परिस्थिती चिघळण्याचे संकेत

हिंदुस्थाननं जिरवली, तरी पाकिस्तानला युद्धाची खुमखुमी; सैन्य LoC वर आणण्यास सुरुवात, परिस्थिती चिघळण्याचे संकेत

पहलगाम हल्ल्याचा बदला घेत हिंदुस्थानने ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले आणि पाकिस्तान, पीओकेमध्ये घुसून दहशतवादी तळ नष्ट केले. यामुळे बिथरलेल्या पाकिस्ताने 8 आणि 9 मेच्या रात्री ड्रोन्स आणि क्षेपणास्त्राने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हा हल्ला हिंदुस्थानने परतवून लावला. यामुळे अधिकच चेकाळलेल्या पाकिस्तानने 9 आणि 10 मेच्या रात्री अत्याधुनिक क्षेपणास्त्र डागली. या क्षेपणास्त्रांच्याही हिंदुस्थानने हवेतच चिंधड्या केल्या आणि पाकिस्तानमधील अनेक हवाई तळ उद्ध्वस्त केले.

हिंदुस्थानने एवढी जिरवली तरीही पाकिस्तानची युद्धाची खुमखुमी काही कमी झालेली नाही. नियंत्रण रेषेवरही पाकिस्तानची आगळीक सुरुच आहे. शस्त्रसंधींचे उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानने आता सैन्य नियंत्रण रेषेजवळ आणण्यास सुरुवात केली आहे. परराष्ट्र मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाच्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी ही माहिती दिली. यामुळे तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.

पाकिस्ताने नियंत्रण रेषेजवळ सैन्याची जमावाजमव सुरू केली आहे. पाकिस्तानची ही कृती आक्रमक हेतूने असून तणाव वाढवणारी आहे. पाकिस्तानच्या कोणत्याही नापाक कृत्याला प्रभावी प्रत्युत्तर देण्यासाठी हिंदुस्थानी लष्कर सज्ज आहे. शत्रूच्या प्रत्येक कृतीला प्रभावीपणे उत्तरही देण्यात आलेला आहे. मात्र पाकिस्तानने योग्य प्रतिसाद दिला तर तणाव कमी करण्याचा प्रयत्न हिंदुस्थानकडून करण्यात येईल, असेही व्योमिका सिंह यांनी स्पष्ट केले.

India Pakistan War – नूरखान, रफिकी, मुरीद आणि रहीम यार खान एअरबेस हिंदुस्थानने उडवले; पाकिस्तानला जबरदस्त तडाखा

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

भारत -पाकिस्तानमध्ये तणाव, मुंबई पोलिसांचा मोठा निर्णय; आता या गोष्टींवर बंदी भारत -पाकिस्तानमध्ये तणाव, मुंबई पोलिसांचा मोठा निर्णय; आता या गोष्टींवर बंदी
पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला होता, या हल्ल्यामध्ये 26 जणांना आपला जीव गमवावा लागला, यामध्ये 25 भारतीय तर एका नेपाळी...
लग्नाआधीच प्रेग्नंट,बाळाला स्वीकारण्यास बॉयफ्रेंडचा नकार; अखेर बॉलिवूड अभिनेत्रीने केलं अबॉर्शन,कंगनाने दिला धीर
‘तुझ्या मुस्लिम नवऱ्याला सोडून दे’, पाकिस्तानी युजरच्या कमेंटवर अभिनेत्रीचा संताप, म्हणाली ‘पाळलेले दहशतवादी…’
नाना पाटेकर यांनी ब्रेक दिला आणि… ; विक्रम गायकवाडांबद्दल काय म्हणाले?
सकाळी की संध्याकाळी… मधुमेहाच्या रुग्णाने कारल्याचा रस कधी प्यावा?
उच्च रक्तदाबावर रामबाण अस्त्र; पतंजली बीपी ग्रिट वटीचा फायदा जाणून घ्या
India Pak War – हिंदुस्थान-पाकिस्तान शस्त्रसंधीसाठी तयार, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा