India Pak War – राजस्थानच्या तीन शहरांना अलर्ट, लोकांनी घरीच थांबण्याचे प्रशासनाचे आवाहन

India Pak War – राजस्थानच्या तीन शहरांना अलर्ट, लोकांनी घरीच थांबण्याचे प्रशासनाचे आवाहन

हिंदुस्थान पाकिस्तानच्या तणावादरम्यान राजस्थानच्या तीन शहरांत अलर्ट जारी करण्यात आला आहे. बाडमेर, श्री गंगानगर आणि जोधपूर शहरातील नागरिकांनी तातडीने आपल्या घरी जावे असे निर्देश सरकारने दिले आहेत.

बाडमेरच्या जिल्ह्याधिकारी टिना डाबी म्हणाल्या की शहरातील सर्वा नागरिकांना घरी परतण्याचे निर्देश देण्यात आले आहे. यावेळी संपूर्ण बाजार बंद राहिल आणि शहरातले सर्व कामकाज बंद राहिल असेही डाबी म्हणाल्या. पहाटे पाच वाजता राजस्थानच्या काही भागातं रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. त्यावेळी पाकिस्तानचे अनेक ड्रोन्स रहिवाशी भागात घिरट्या घालत होते. पण हिंदुस्थानी सैन्याने हे ड्रोन हवेतच नष्ट कले. या भागात 12 तासांसाठी ब्लॅकआऊट करण्यात आला होता.

श्री गंगानगर भागात प्रशासनाने लॉकडाऊन लावला आहे. तसेच लोकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन केले आहे. जोधपूरमध्ये जिल्हा प्रशासनाने लोकांना तातडीने घरी जाण्याचे निर्देश दिले आहे. तसेच यावेळी संपूर्श शहर बंद राहील आणि लोकांनी बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. तर दुसरीकडे जैसलमेर भागात सुरक्षेच्या कारणास्तव बाजार बंद करण्यात आले आहेत. सार्वजनिक ठिकाणी लोकांनी जमू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

भारत -पाकिस्तानमध्ये तणाव, मुंबई पोलिसांचा मोठा निर्णय; आता या गोष्टींवर बंदी भारत -पाकिस्तानमध्ये तणाव, मुंबई पोलिसांचा मोठा निर्णय; आता या गोष्टींवर बंदी
पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला होता, या हल्ल्यामध्ये 26 जणांना आपला जीव गमवावा लागला, यामध्ये 25 भारतीय तर एका नेपाळी...
लग्नाआधीच प्रेग्नंट,बाळाला स्वीकारण्यास बॉयफ्रेंडचा नकार; अखेर बॉलिवूड अभिनेत्रीने केलं अबॉर्शन,कंगनाने दिला धीर
‘तुझ्या मुस्लिम नवऱ्याला सोडून दे’, पाकिस्तानी युजरच्या कमेंटवर अभिनेत्रीचा संताप, म्हणाली ‘पाळलेले दहशतवादी…’
नाना पाटेकर यांनी ब्रेक दिला आणि… ; विक्रम गायकवाडांबद्दल काय म्हणाले?
सकाळी की संध्याकाळी… मधुमेहाच्या रुग्णाने कारल्याचा रस कधी प्यावा?
उच्च रक्तदाबावर रामबाण अस्त्र; पतंजली बीपी ग्रिट वटीचा फायदा जाणून घ्या
India Pak War – हिंदुस्थान-पाकिस्तान शस्त्रसंधीसाठी तयार, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा