कर्जतच्या ‘सुटकेस बॉडी’चे गूढ उकलले, 200 सीसीटीव्हीचा मागोवा घेत पोलिसांची मारेकऱ्यांवर झडप

कर्जतच्या ‘सुटकेस बॉडी’चे गूढ उकलले, 200 सीसीटीव्हीचा मागोवा घेत पोलिसांची मारेकऱ्यांवर झडप

कर्जतच्या रेल्वे ट्रॅकवर सापडलेल्या सुटकेस बॉडीचे गूढ अखेर 25 दिवसांत उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. तपास पथकाने तब्ब्ल 200 सीसीटीव्ही फुटेजचा मागोवा घेत दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. यात एका महिलेचाही समावेश असून मृत महिला आणि आरोपी हे मित्र असल्याचे समोर आले आहे. व्ही. विजयकुमार व्यंकटेश आणि टी. यशस्विनी राजा असे दोघा आरोपींची नावे असून मृत महिलेचे नाव धनलक्ष्मी यरप्पा रेड्डी असे समोर आले आहे. हे तिघेही पवई येथे राहत होते.

16 एप्रिल रोजी मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वे मार्गावर कर्जतजवळील ठाकूरवाडी स्टेशन परिसरात गुलाबी रंगाच्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह सापडून आला होता. 15 एप्रिल रोजी आरोपी व्ही. विजयकुमार व्यंकटेश व टी. यशस्विनी राजा ही महिला लोकमान्य टिळक टर्मिनल फलाट क्रमांक चारवर आले. यावेळी सुटकेस घेऊन जाताना ते बळाचा वापर करत असल्याचे लक्षात आल्याने हेच आरोपी असावे अशी दाट शक्यता निर्माण झाली. दरम्यान, बंगळुरू स्थानकात व्यंकटेश व टी. यशस्विनी रिकाम्या हात उतरल्याचे पोलिसांना दिसून आल्याने त्यानुसार तपासाची चक्रे फिरवण्यात आली.

20 हजारांचे बक्षीस जाहीर
मृत धनलक्ष्मी अविवाहित होती. ती मूळची आंध्र प्रदेशातील हंमप्पा पुरम रायपाडू रायताडू येथील रहिवासी होती. 16 तारखेपर्यंत आरोपींना पोलिसांना कोठडी सुनावली आहे. तपासात नेरळ पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक संदीप फड, पोलीस शिपाई श्रीकांत, पोलीस शिपाई बेंद्रे, शिपाई वांगणेकर, वाघमारे, दवणे यांनी खुनाचा तपास लावण्यात मोठे यश मिळविले. या कामगिरीमुळे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी पथकातील पोलिसांना 20 हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

भारत-पाकिस्तानमध्ये युद्धविराम! मलायका अरोरासह अनेक सेलिब्रिटींनी सोडला सुटकेचा नि:श्वास, पोस्ट व्हायरल भारत-पाकिस्तानमध्ये युद्धविराम! मलायका अरोरासह अनेक सेलिब्रिटींनी सोडला सुटकेचा नि:श्वास, पोस्ट व्हायरल
ऑपरेशन सिंदूर नंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू झालेला तणाव आणि हल्ले आता संपले आहेत. अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर, भारत आणि पाकिस्तानमध्ये पूर्ण...
‘आता भारताने पुन्हा रक्तपात करू नये…’ भारत-पाक युद्धविरामनंतर रवीना टंडनची पोस्ट व्हायरल
India Pakistan Ceasefire : शांतीच्या दिशेने टाकलेलं प्रत्येक पाऊल, हे दहशतवादाविरोधात सामूहिक लढ्याचं बळ वाढवतं – शरद पवार
India Pakistan Ceasefire : दोन्ही देशांमध्ये समुद्र, हवाई आणि जमिनीवरील सर्व लष्करी कारवाया थांबवण्यावर सहमती – संरक्षण मंत्रालय
India Pakistan Ceasefire : युद्धविरामावर एकमत, पण दहशतवाद विरोधात कुठलीही तडजोड करणार नाही – एस जयशंकर
India Pakistan Tension – उल्हासनगर महापालिकेची वेबसाईट हॅक! पाकिस्तानी हॅकर्सकडून दावा
India Pakistan Ceasefire – हिंदुस्थानने आपल्या अटींवर युद्धविराम केला, परराष्ट्र मंत्रालयाची शस्त्रसंधीची घोषणा