पहलगाम हल्ल्याची जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे; विजय वडेट्टीवार यांची मागणी

पहलगाम हल्ल्याची जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे; विजय वडेट्टीवार यांची मागणी

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्याची जबाबदारी केंद्र सरकारने घेतली पाहिजे, असे मत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले आहे. अशा प्रकारचे हल्ले हे सरकारचे अपयश स्पष्ट करतात, असेही त्यांनी म्हटले आहे.

दशतवाद्यांनी धर्म विचारुन पर्यटकांची हत्या केल्याचा दावा चुकीचा असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. दहशतवाद्यांना कोणताही जात-धर्म नसतो. या प्रकरणात दोषी असणाऱ्या व्यक्तींवर त्वरीत कारवाई करावी. या प्रकारास इतर कोणताही रंग देऊ नये, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. पहलगाम हल्लाची जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे. त्या ठिकाणी सुरक्षा का नव्हती? 200 किलोमीटरपर्यंत दहशतवादी कसे आले? तुमच्या गुप्तचर यंत्रणा काय करत होत्या? सुरक्षेत चूक कशी झाली? यावर विचार केला पाहिजे. या प्रकरणात दुसरीकडे लक्ष घेऊन जाणे चुकीचे आहे, असे वडेट्टीवार यांनी म्हटले.

विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारमधील मंत्र्यांच्या वादावर बोट ठेवत सांगितले की, अलीकडे गोंधळी सरकार आहे. एक मंत्री दुसऱ्या मंत्र्यांच्या मतदारसंघात जातो आणि हिंदूत्त्व सांगतो. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात, पाकिस्तानचा एकही नागरीक महाराष्ट्रात नाही. दुसरीकडे नगरविकास खात्याचे मंत्री म्हणतात, 107 पाकिस्तानी सापडत नाही. इतका समन्वयाचा अभाव दिसत आहे. यावरुन हे सरकार किती गोंधळलेले हे दिसत आहे, अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापार आणि युद्धबंदीवर केलेल्या वक्तव्यावर पंतप्रधानांनी स्पष्टीकरण द्यावं, काँग्रेसची मागणी डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापार आणि युद्धबंदीवर केलेल्या वक्तव्यावर पंतप्रधानांनी स्पष्टीकरण द्यावं, काँग्रेसची मागणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी देशाला संबोधित करताना पाकिस्तानसोबत चर्चा ही फक्त पाकव्याप्त कश्मीर आणि दहशतवादावरच होईल असे सांगितले. तसेच...
जालन्यात वीज पडून तरुण शेतकर्‍याचा मृत्यू
हिंदुस्थान-पाकिस्तानमध्ये तात्काळ शस्त्रसंधीसाठी आम्ही मदत केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा दावा
शिर्डीला दर्शनासाठी जाणार्‍या भाविकाच्या कारला अपघात, पती-पत्नी ठार तर पाच जण गंभीर जखमी
पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही, पाकिस्तानशी चर्चा फक्त POK वरच – पंतप्रधान मोदी
रायपूरमध्ये ट्रक आणि ट्रेलरची धडक, 13 जणांचा मृत्यू; रस्त्यावर पडला रक्त मांसाचा सडा
भारत आणि पाकिस्तान युद्धविरामासाठी अमेरिकेची मध्यस्थी, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया समोर, ‘तो’ दाखला देत म्हणाले…