डहाणू, तलासरीत आंब्याला कागदी पिशव्यांचे सुरक्षा कवच; पक्षी, ढगाळ वातावरणाने बागायतदारांची डोकेदुखी

डहाणू, तलासरीत आंब्याला कागदी पिशव्यांचे सुरक्षा कवच; पक्षी, ढगाळ वातावरणाने बागायतदारांची डोकेदुखी

ढगाळ हवामान, तापमानातील चढ-उतार आणि वातावरणातील बदल यामुळे यंदा आंबा उत्पादनावर संकट कोसळले असून डहाणू व तलासरी भागातील आंबा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. त्यामुळे आंबा फळांचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी फळांना कागदी पिशव्यांचे आवरण लावण्यास सुरुवात केली आहे. या सुरक्षा कवचाने ऊन, वारा, पक्षी आणि कीटकांपासून संरक्षण मिळत आहे. मात्र असे असले तरी खर्चात वाढ होत असल्याने बागायतदारांचे आर्थिक बजेट
कोलमडले आहे.

गेल्या काही दिवसात हवामानात अचानक बदल झाल्यामुळे दिवसाच्या तापमानात वाढ, तर पहाटे थंडी अशी विषम स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी फळगळ आणि रोगराई वाढू लागली आहे. यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता असून, आर्थिक नुकसान टाळण्यासाठी संरक्षणात्मक उपाय म्हणून कागदी पिशव्यांचा वापर वाढवला जात आहे. डहाणूतील आंबा उत्पादक शेतकरी सुदीप म्हात्रे यांनी या तंत्रज्ञानाचे महत्त्व पटवून दिले आहे.

फळांचे पोषण टिकून राहते
साध्या कागदी पिशव्या बाजारात फक्त 1 रुपयाला उपलब्ध असून, त्या सहज वापरता येतात. 25-20 सेंमी आकाराच्या या पिशव्या आहेत. या पिशव्या फळांना दवबिंदू, पी, बंद, परमामी आणि कडक उन्हापासून संरक्षण देतात. त्याचबरोबर पिशव्या वापरल्यास फळगळ कमी होते. फळांचा रंग, वजन आणि गोडी वाढते. कीटकनाशक फवारणीची गरज कमी होते. एकसमान रंग निर्माण होतो. फळांचे पोषण टिकून राहते. तसेच सेंद्रिय उत्पादनास चालना मिळते.

पालघर जिल्ह्यात आंबा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात विक्रीसाठी येतात. त्याआधीच पिशव्या चढवल्यास उष्णतेपासून होणारे नुकसान टाळता येते. कागदी पिशव्यांचा वापर हे आंबा उत्पादकांसाठी एक योग्य आणि फायदेशीर पाऊल ठरेल. – प्रशांत जाधव, आंबा उत्पादक

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

भारत -पाकिस्तानमध्ये तणाव, मुंबई पोलिसांचा मोठा निर्णय; आता या गोष्टींवर बंदी भारत -पाकिस्तानमध्ये तणाव, मुंबई पोलिसांचा मोठा निर्णय; आता या गोष्टींवर बंदी
पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला होता, या हल्ल्यामध्ये 26 जणांना आपला जीव गमवावा लागला, यामध्ये 25 भारतीय तर एका नेपाळी...
लग्नाआधीच प्रेग्नंट,बाळाला स्वीकारण्यास बॉयफ्रेंडचा नकार; अखेर बॉलिवूड अभिनेत्रीने केलं अबॉर्शन,कंगनाने दिला धीर
‘तुझ्या मुस्लिम नवऱ्याला सोडून दे’, पाकिस्तानी युजरच्या कमेंटवर अभिनेत्रीचा संताप, म्हणाली ‘पाळलेले दहशतवादी…’
नाना पाटेकर यांनी ब्रेक दिला आणि… ; विक्रम गायकवाडांबद्दल काय म्हणाले?
सकाळी की संध्याकाळी… मधुमेहाच्या रुग्णाने कारल्याचा रस कधी प्यावा?
उच्च रक्तदाबावर रामबाण अस्त्र; पतंजली बीपी ग्रिट वटीचा फायदा जाणून घ्या
India Pak War – हिंदुस्थान-पाकिस्तान शस्त्रसंधीसाठी तयार, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा