भारत -पाकिस्तानमध्ये तणाव, मुंबई पोलिसांचा मोठा निर्णय; आता या गोष्टींवर बंदी

भारत -पाकिस्तानमध्ये तणाव, मुंबई पोलिसांचा मोठा निर्णय; आता या गोष्टींवर बंदी

पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला होता, या हल्ल्यामध्ये 26 जणांना आपला जीव गमवावा लागला, यामध्ये 25 भारतीय तर एका नेपाळी नागरिकाचा समावेश होता. या हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानविरोधात कठोर पाउलं उचलली, सिंधू पाणी वाटप कराराला स्थगिती देण्यात आली, तसेच पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा देखील रद्द करण्यात आले,  त्यानंतर भारतानं पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक केला, या हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांची 9 ठिकाणं उद्ध्वस्त करण्यात आली. भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाला आहे.

पाकिस्तानकडून भारतावर हल्ल्याचा प्रयत्न होत आहे, मात्र भारताकडून हे हल्ले परतून लावण्यात आले आहेत. प्रत्युत्तर म्हणून भारतानं देखील पुन्हा एकदा पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला, या हल्ल्यामध्ये पाकिस्तानची संपूर्ण रडार सिस्टिम उद्ध्वस्त करण्यात आली आहे, या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे आता भारत आणि पाकिस्तानमधील तणाव प्रचंड वाढला आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी आता मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईत उद्यापासून फटाके आणि रॉकेट उडवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. सीमेवरील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. 11 मे पासून ते 9 जूनपर्यंत मुंबईत फटाके फोडण्यावर बंदी घालण्यात आली आहे, या संदर्भात मुंबई पोलिसांकडून आदेश जारी करण्यात आले आहेत.

पाकिस्तानकडून कुरापती सुरूच 

दरम्यान पाकिस्तानकडून कुरापती सुरूच आहेत, भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, भारतानं हा हल्ला परतून लावला, त्यानंतर भारतानं प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानवर पुन्हा एकदा ड्रोन हल्ला केला, पाकिस्तानच्या 15 शहरांमध्ये 50 ड्रोन हल्ले करण्यात आले, या हल्ल्यामध्ये पाकिस्तानची रडार सिस्टिम उद्ध्वस्त करण्यात आली, मात्र त्यानंतर देखील पाकिस्तानने भारतावर हल्ल्याचा प्रयत्न केला, सीमा भागामध्ये देखील पाकिस्तानकडून गोळीबार सुरूच आहे. भारताकडून देखील पाकिस्तानच्या या कृतीला चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे, भारतानं केलेल्या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानचं मोठं नुकसानं झालं आहे. त्यामुळे तणाव आणखी वाढला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Kokan News – प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस; सृजन सायन्स सेंटरचा अभिनव उपक्रम Kokan News – प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस; सृजन सायन्स सेंटरचा अभिनव उपक्रम
देवरुख शहरातील सृजन सायन्स अँड इनोव्हेशन ऍक्टिव्हिटी सेंटरतर्फे कचरा निर्मूलन मोहीम स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी जास्तीत...
परतीच्या पावसाने कापलेली भात शेती पुन्हा रुजली, ऑक्टोबर महिना संपला तरीही पाऊस सुरूच
Kokan News – देवरुख येथील सृजन विज्ञान केंद्रात आली अवकाश शास्त्राची नवीन मॉडेल्स
किशोरवयीन मुलांना AI ची भुरळ, वैद्यकीय माहिती आणि रोमान्ससाठी AI चा अधिक वापर!
सरकारकडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ, 5 रुपयांची दिली मदत; विजय वडेट्टीवार यांच्याकडून संताप व्यक्त
…असा असेल सत्याचा मोर्चा; सर्वपक्षीय बैठकीनंतर अनिल परब यांनी दिली माहिती
तुम्ही पण फ्रिजमध्ये ठेवलेला शिळा भात पुन्हा गरम करून खाता का? मग हे वाचाच; जाणून आश्चर्य वाटेल