पहलगाम हल्ल्याचा आणि गुजरातच्या मुंद्रा बंदरावर आढळलेल्या ड्रग्जचा थेट संबंध! NIA चा सर्वोच्च न्यायालयात दावा

पहलगाम हल्ल्याचा आणि गुजरातच्या मुंद्रा बंदरावर आढळलेल्या ड्रग्जचा थेट संबंध! NIA चा सर्वोच्च न्यायालयात दावा

गुजरातच्या मुंद्रा बंदरात 21 हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज सापडले होते. या ड्रग्जचा आणि पहलगामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा थेट संबंध असल्याचा दावा राष्ट्रीय तपास संस्थेने केला आहे. तसेच हे ड्रग्ज लश्कर ए तोयबाच्या ड्रग रॅकेटचा भाग असून या माध्यमातून हिंदुस्थानला खिळखिळा करण्याचा डाव असल्याचेही तपाससंस्थेने म्हटले आहे.

महाधिवक्ता ऐश्वर्या भाटी सर्वोच्च न्यायालयात म्हणाल्या की पहलगामध्ये दहशतवाद्यांनी हिंदुस्थानींचा जीव घेतला. टॅल्क स्टोन सांगून अफगाणिस्तानवरून हिंदुस्थानात हजारो कोटी रुपयांचे ड्रग्ज आणले गेले. दिल्लीच्या कबीर तलवारने हे ड्रग्ज नेब सराई आणि अलिपूरमध्ये ठेवलं होतं. या ड्रग्जचा संबंध लश्कर ए तोयबाशी असल्याचे भाटी यांनी सांगितले.

राष्ट्रीय तपाससंस्थेने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की अफगाणिस्तानमधील अंमली पदार्थाचे तस्कर पाकिस्तानच्या आयएसआयची आणि इराणी तस्करांची मदत घेतात. यांच्या माध्यमातून 21 हजार कोटी रुपयांचे तीन हजार किलो ड्रग्ज हिंदुस्थानात आणले गेले. या ड्रग्जच्या माध्यमातून जे पैसे मिळणार होते ते पैसे दहशतवादी हल्ल्यासाठी वापरले जाणार होते असे राष्ट्रीय तपास संस्थेने म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

विश्वासघात! पाकिस्तानचे शेपूट वाकडेच… अवघ्या काही तासात शस्त्रसंधीचे उल्लंघन, श्रीनगरमध्ये स्फोट; ओमर अब्दुल्ला यांचा संताप विश्वासघात! पाकिस्तानचे शेपूट वाकडेच… अवघ्या काही तासात शस्त्रसंधीचे उल्लंघन, श्रीनगरमध्ये स्फोट; ओमर अब्दुल्ला यांचा संताप
हिंदुस्थान आणि पाकिस्तान मध्ये शस्त्रसंधी झाल्याच्या काही तासातच पाकिस्तान पुन्हा एकदा सीमेवर गोळीबार व ड्रोन हल्ले केले आहेत. जम्मू काश्मीर...
India Pakistan Ceasefire : पहलगामच्या पीडितांना न्याय मिळाला की नाही? युद्धविरामानंतर काँग्रेसचा सवाल
India Pakistan Tension – शस्त्रसंधी झाली मात्र हिंदुस्थानने पाकिस्तानच्या खोटारडेपणा बुरखा फाडलाच!
India Pakistan Ceasefire : संरक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या आपल्या सशस्त्र दलांना सलाम – आदित्य ठाकरे
भारत-पाकिस्तानमध्ये युद्धविराम! मलायका अरोरासह अनेक सेलिब्रिटींनी सोडला सुटकेचा नि:श्वास, पोस्ट व्हायरल
‘आता भारताने पुन्हा रक्तपात करू नये…’ भारत-पाक युद्धविरामनंतर रवीना टंडनची पोस्ट व्हायरल
India Pakistan Ceasefire : शांतीच्या दिशेने टाकलेलं प्रत्येक पाऊल, हे दहशतवादाविरोधात सामूहिक लढ्याचं बळ वाढवतं – शरद पवार