जॉशच्या संयमी माऱ्यामुळे सामना बंगळुरूच्या बाजूने झुकला, अ‍ॅण्डी फ्लॉवरने हेझलवूडची थोपटली पाठ

जॉशच्या संयमी माऱ्यामुळे सामना बंगळुरूच्या बाजूने झुकला, अ‍ॅण्डी फ्लॉवरने हेझलवूडची थोपटली पाठ

अत्यंत चुरशीच्या सामन्यात जॉश हेझलवूडने अखेरच्या षटकात निर्माण झालेली परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळली. तसेच, बिकट परिस्थितीमध्ये योग्य चेंडू कसा टाकायचा याची त्याला कल्पना असल्यामुळे त्याने संयमाने गोलंदाजी केल्यामुळेच बंगळुरूला राजस्थानविरुद्ध विजय मिळवता आला, अशा शब्दांत बंगळुरूचे मुख्य प्रशिक्षक अ‍ॅण्डी फ्लॉवरनी हेझलवूडची पाठ थोपटत कौतुक केले.

शेवटच्या षटकांमध्ये हेझलवूडच्या शानदार गोलंदाजीमुळे बंगळुरूला घरच्या मैदानावर पहिला विजय मिळवता आला. हेझलवूडने त्याच्या शेवटच्या दोन षटकांमध्ये केवळ 7 धावा देत 4 विकेट टिपले. त्याने चार षटकांत 33 धावा देत चार विकेट्स घेतल्यामुळे बंगळुरूला नऊ सामन्यांतील सहावा विजय मिळवता आला.

फ्लॉवर म्हणाले, मी त्याच्या शेवटच्या दोन षटकांबद्दल बोलेन; कारण त्याच्या दोन षटकांमध्ये केवळ सात धावा देत तीन विकेट घेतल्या. या दोन षटकांमध्येच सामना बंगळुरूच्या बाजूने झुकला. तो एक उत्तम जागतिक दर्जाचा गोलंदाज आहे. त्यामुळे कोणत्याही स्वरूपात दबाव हाताळण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. त्याच्याकडे सर्व प्रकारचे चेंडू टाकण्याची क्षमता आहे. त्याने यॉर्कर, वाइड यॉर्कर आणि स्लो बॉलचे उत्तम मिश्रण टाकले. त्याला माहीत आहे की, कोणत्या प्रकारचा चेंडू कधी टाकायचा. तीन वेगवेगळ्या प्रकारचे वेगवान गोलंदाजी आक्रमण हे बंगळुरूचे सर्वात मोठे बलस्थान आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

नाना पाटेकर ते अच्युत पोतदार…, फक्त सिनेमांमध्ये नाही तर, सैन्यात देखील ‘या’ अभिनेत्यांनी बजावली महत्त्वाची भूमिका नाना पाटेकर ते अच्युत पोतदार…, फक्त सिनेमांमध्ये नाही तर, सैन्यात देखील ‘या’ अभिनेत्यांनी बजावली महत्त्वाची भूमिका
22 एप्रिल ही अशी तारीख आहे की या दिवसाने संपूर्ण भारताला हादरवलं. या दिवशी काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला,...
मोठ्या पडद्यावर आंबेडकर, सरदार पटेल जिवंत करणारे प्रसिद्ध मेकअप मॅन विक्रम गायकवाड यांचं निधन
‘ओ दीदी…अब काम मांगने मत आना…’ भारताविरोधात बोलणाऱ्या माहिरा खानवर भडकला अभिनेता
पाकिस्तानसाठी मृत्यूची घंटा झालेली रवीना टंडन, माजी पंतप्रधानांची उडालेली झोप, कारण समोर
पंजाब आणि जम्मूमधील अनेक रेल्वे रद्द, सुरक्षेच्या कारणास्तव रेल्वे प्रशासनाचा निर्णय
…पण कोणीही दहशतवाद पोसू नये, ‘तारक मेहता…’ फेम बबिताजींनी पाकला सुनावलं; हिंदुस्थानच्या जवानांना केला सॅल्यूट
India Pakistan War – बातम्या दाखवताना सायरनचा आवाज वापरू नका, केंद्रीय गृहमंत्रालयाचे न्यूज चॅनेल्सना सूचना