Exclusive – आम्ही राष्ट्रभक्त होण्याचा खूप प्रयत्न केला, पण दहशतवादी कुठून तरी येतात आणि आमच्या इज्जतीचा कचरा करून जातात! कश्मिरींची खंत

Exclusive – आम्ही राष्ट्रभक्त होण्याचा खूप प्रयत्न केला, पण दहशतवादी कुठून तरी येतात आणि आमच्या इज्जतीचा कचरा करून जातात! कश्मिरींची खंत

>> प्रभा कुडके, विशेष प्रतिनिधी

जम्मू-कश्मिरात पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश हादरला आहे. याचा सर्वात मोठा फटका जम्मू-काश्मीरमधील पर्यटन उद्योग आणि त्यासंबंधित उद्योग-व्यवसायांना बसला आहे. या दहशतवादी हल्ल्यामुळे या व्यावसायिकांचे किती नुकसान होणार आहे? तसेच कश्मीरची प्रतिमा मलिन होत आहे याबाबत कॅब चालकाने खेद व्यक्त केला. जम्मू-कश्मीर हे राज्य आदरातिथ्य, पाहुणचार याबाबत प्रसिद्ध होतो, मात्र या दहशतवादी कृत्याने प्रतिमा मलिन होत आहे. कोणत्याही धर्मात अशा प्रकारच्या हिंसाचाराला थारा नाही, तसेच कश्मिरीही या दहशतवाद्यांचे समर्थन करणार नाही, असे कॅब चालक हारिस खान याने ‘दै. सामना’शी बोलताना स्पष्ट केले.

पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू-कश्मीरमधील पर्यटक घरी परतत आहेत. तसेच अनेकांनी आपले बुकिंगही रद्द केले आहे. याचा थेट फटका पर्यटनाशी संबंधित उद्योग- व्यवसायांना बसत आहे. याबाबत बोलताना हारिस म्हणाला की, पर्यटक नक्कीच कमी झाले आहेत. ही घटना घडल्यापासून माझ्या आईने, बहिणीने, भावानेही काही खाल्लेले नाही. मृत्यू अंतिम सत्य आहे, प्रत्येकाला एक दिवस जायचेच आहे. पण या दहशतवादी कृत्यामुळे कश्मिरींचे नाव बदनाम झाले. आम्ही कितीही आदरातिथ्य, पाहुणचार केला तरी सगळे पूर्वीसारखे होणार नाही. आज कश्मिरी विद्यार्थ्यांनाही मारहाण केली जात आहे. हा दहशतवादी हल्ला झाला नसता तर देशभरात आमची इज्जत राहिली असती. 2019 नंतर आम्ही चांगले नागरिक, राष्ट्रभक्त होण्याचा खूप प्रयत्न केला. पण अशी दहशतवादी लोक कुठून येतात आणि आमच्या इज्जतीचा कचरा करून जातात माहिती नाही.

तो पुढे म्हणाला की, विमानतळावर फक्त जाणारे लोक दिसत आहेत. विमानतळाबाहेर येताना कुणीही दिसत नाही. आपलीच जमीन, आपलाच देश, आपल्याच लोकांना सोडून सगळे माघारी चालले आहे. देशातील कोणत्याही राज्यात तुम्हाला एवढे आदरातिथ्य मिळणार नाही, तेवढे आम्ही केले. पण एक घटना घडली अन्…. ही घटना घडल्यापासून माझी आजी जेवलीही नाही.

जुने जाणते लोक म्हणतात, 1947 पासून पहिल्यांदाच हिंदुस्थानच्या बाजुने कश्मीरने बंद पाळला. अलगाववादी, हुर्रियत, राजकारणी सगळ्यांनी बंदला समर्थन दिले. आम्ही एकच झेंडा, एकच संविधान मानतो. आमच्यावर विश्वास ठेवा. या दहशतवादी कृत्यात आमचा सहभाग नाही. देशभरातली लोकांनी कश्मिरात यावे, आणि आम्हाला आदरातिथ्याची संधी द्यावी, असेही तो म्हणाला.

आमचीही इच्छा आहे की या भ्याड हल्ल्यात जे लोक सहभागी आहेत त्यांना यमसदनी धाडावे. या दहशतवादी कृत्यात एखाद्या कश्मिरीचा सहभागा असेल तर कायदा तर त्याला शिक्षा देईलच, पण त्याआधी आम्ही कश्मिरी त्याला लाल चौकात घंटाघरात फाशी देऊ, असेही हारिस खान म्हणाला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कल्याणचे रुक्मिणीबाई रुग्णालय सुधारायचे नाव घेईना! गर्भवती महिलेला उपचार नाकारत खासगी रुग्णालयात पाठवले, गरीब कुटुंबाला 50 हजारांचा भुर्दंड कल्याणचे रुक्मिणीबाई रुग्णालय सुधारायचे नाव घेईना! गर्भवती महिलेला उपचार नाकारत खासगी रुग्णालयात पाठवले, गरीब कुटुंबाला 50 हजारांचा भुर्दंड
रुग्णवाहिका न मिळाल्याने एका महिलेचा रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या दारातच मृत्यू झाला होता. रुग्णालय प्रशासनाच्या बेफिकिरीची गंभीर दखल घेत पालिका आयुक्तांनी सहा...
रोहितचा वारसदार सलामीवीरच; शुभमन गिलच जिंकणार निवड समितीचे दिल, राहुलचीही एण्ट्री, पंतच्या नावाचाही विचार
खरेदीचा बहाणा करून रक्कम करायचे लंपास, बंटी-बबली अटकेत
टिटवाळ्यातील तरुणीवर अमानुष अत्याचार; नशेचे इंजेक्शन देऊन 10 दिवस सामूहिक बलात्कार, 7 नराधमांविरोधात गुन्हा दाखल
पेणमध्ये बाप-लेक ‘सेम टू सेम’, माजी सैनिकाने 48 व्या वर्षी मुलीसोबत दिली बारावीची परीक्षा; दोघांना सारखेच गुण
तळाजवळील तारणे गावात भीषण अपघात, भरधाव डम्परची एसटीला धडक; चौघांचा मृत्यू, मृतांमध्ये चिमुकलीचा समावेश
खोट्या देशभक्तीचा बुरखा फाटला, बांगलादेशी घुसखोरांसाठी भाजपची वकिली