दंगली चाललेल्या राज्यावर राज्य करणार का?

दंगली चाललेल्या राज्यावर राज्य करणार का?

औरंगजेब जुलमी होता. त्याच्याबद्दल आस्था असण्याचे कारण नाही. मात्र, सध्या रोजगार, महागाई, शेतीमालाला बाजार नाहीत हे प्रश्न आहेत. अत्याचार आणि भ्रष्टाचार वाढला असून, नागपूरसारख्या घटना घडत आहेत. सरकारकडून अशा गोष्टींना प्रोत्साहन मिळत असेल तर हे दुर्दैवी असल्याची टीका काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केली. तसेच तुम्ही दंगली चाललेल्या राज्यावर राज्य करणार का? असा सवालदेखील त्यांनी सरकारला केला.

बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन देवगड येथे करण्यात आले होते. त्यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ आदी उपस्थित होते.

मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणीच्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली आहे. यावर थोरात म्हणाले, हे सरकार काहीही करू शकते. तसेच, मंत्री जयकुमार गोरे यांच्या बातम्या देणाऱ्या पत्रकारालादेखील अटक केली. यामुळे राज्यात लोकशाही राहिलेली नाही.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;