राजकीय नेत्यांनी बोलताना तारतम्य ठेवावं, अजित पवार यांनी गृह राज्यमंत्र्यांचे कान टोचले

राजकीय नेत्यांनी बोलताना तारतम्य ठेवावं, अजित पवार यांनी गृह राज्यमंत्र्यांचे कान टोचले

पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणावर बोलताना गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी अकलेचे तारे तोडले होते. ‘बलात्कार शांततेत पार पडला’, असे वादग्रस्त विधाना त्यांनी केले होते. यामुळे त्यांच्यावर टीकेचा भडीमार होऊ लागला. राजकीय वर्तुळासह सोशल मीडियावर नेटकऱ्यांनीही त्यांच्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली असून गृह राज्यमंत्री योगेश कदम यांचे कान टोचले आहेत.

पुणे बस बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला पोलिसांनी मध्यरात्री अटक केली. याबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना अजित पवार म्हणाले की, नराधमाला अटक व्हावी म्हणून आम्ही प्रयत्न करत होतो. रात्री एक-दीडच्या सुमारास त्याला अटक झाली. त्याची चौकशी सुरू असून त्यातून काय वस्तुस्थिती आहे हे निष्पन्न होईल. याबाबत आपले पोलिसांशीही बोलणे झाल्याचे अजितदादांनी सांगितले.

चौकशी सुरू असताना माध्यमांमध्ये त्या संदर्भात वृत्त चालवले जाते. चौकशी सुरू असताना आरोपी इकडे गेला, तिकडे गेला. हा व्यक्ती अमूक ठिकाणी गेला, तमूक राज्यात गेला असे सांगितले जाते. मात्र अशा बातम्या देताना तारतम्य बाळगले पाहिजे. त्या माहितीचा विकृत आरोपी फायदा घेऊ शकतो, असे म्हणत अजितदादांनी माध्यमांनाही फटकारले. तसेच राजकीय नेत्यांनीही बोलताना तारतम्य ठेवले पाहिजे, असे म्हणत अप्रत्यक्षपणे अजित पवारांनी गृह राज्यमंत्री योगेश कदम यांचेही कान टोचले.

योगेश कदम यांना बोलायला लाज वाटते का?

पुणे बलात्कार प्रकरणावर बोलताना आपले गृह राज्यमंत्री म्हणतात, ती ओरडलीच नाही. काही लाज, लज्जा, शरम आहे की नाही. तुला आया, बहिणी आहे की नाही. एखाद्या स्त्री बद्दल असे बोलणे की तिच्यावर बलात्कार झाला, पण ती ओरडली नाही म्हणजे नेमके म्हणायचे तरी काय, असा हल्लाबोल आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;