उन्हाळा सुरू होण्यापूर्वी फेब्रुवारी महिन्यातच शिरूर तालुक्यातील तलावांनी गाठला तळ

उन्हाळा सुरू होण्यापूर्वी फेब्रुवारी महिन्यातच शिरूर तालुक्यातील तलावांनी गाठला तळ

उन्हाळा सुरू होण्यापूर्वी फेब्रुवारी महिन्यातच तालुक्यातील तलावांनी तळ गाठला आहे. मोटेवाडी तलाव आठ दिवसांपूर्वी कोरडा पडला आहे. चासकमान कालव्याच्या पाण्याने हे तलाव भरण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

डिसेंबर महिन्यात सोडलेल्या आवर्तनातील चासकमान धरणाचे पाणी तब्बल 50 दिवसांनंतरही टेलला पोहचले नाही. पाण्याअभावी या भागातील शेतकरी आपला नऊ, दहा महिन्यांचा ऊस मिळेल त्या भावाने तोडणीला देत आहेत. तर, एक दीड महिन्याचे कांदापीक शेवटची घटका मोजत आहे. पिके जगविण्यासाठी परिसरातील शेतकरी हतबल झाले आहेत. शिरूर तालुक्यात फेब्रुवारी महिन्यातच शेतीसाठी पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. पूर्व भागातील गुनाट, निमोणे, कर्डे, आंबळे, न्हावरे, निर्वी, कोळगाव, आलेगाव, उरळगाव, आंधळगाव, शिरसगाव या गावांमध्ये विहिरी तसेच विंधन विहिरींची जलपातळी खालावली आहे. तर, अनेक ठिकाणी विहिरी कोरड्या पडू लागल्या आहेत. चासकमान धरणाच्या पाण्यातून भरल्या जाणाऱ्या तलांवापैकी कोळगाव डोळस, आंधळगाव, गुनाट, निमोणे येथील तलावांच्या पाण्याने तळ गाठला आहे. तर, मोटेवाडी तलाव आठ दिवसांपूर्वी कोरडा पडला आहे. या तलावांवर पूर्व भागातील शेकडो एकर शेती अवलंबून आहे. परंतु पाण्याच्या नियोजनाअभावी हे तलाव कोरडे पडले आहेत. विहिरी आणि विंधन विहीरींची पाणीपातळी खालावली आहे. गेल्या वर्षी या भागात पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने डिसेंबर महिन्यात चासकमानचे आवर्तन सोडण्यात आले होते. यंदाही वेळेवर पाणी उपलब्ध होईल, या आशेने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केली आहे.

चासकमानच्या पाण्याची मागणी

■ चासकमानच्या कालव्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करून पाणी लवकरात लवकर सोडावे. हे पाणी शेवटच्या भागात पोहचवावे व आवर्तन बंद करण्यापूर्वी या भागातील सर्व तलाव पूर्ण क्षमतेने भरावेत, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;