रात्रीची 76 लाख मतं कशी वाढली? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल

रात्रीची 76 लाख मतं कशी वाढली? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल

निवडणूक आयोग कुणाची कळसुत्री बाहुली झाली आहे हे सगळ्यांनाच माहित आहे अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. तसेच रात्रीची 76 लाख मतं कशी वाढली? असा सवालही नाना पटोले यांनी विचारला.

नाना पटोले आज मारकडवाडीत पोहोचले. तेव्हा माध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले की, निवडणूक आयोग कुणाची कळसूत्री बाहुली झाली आहे हे सगळ्यांनाच माहित आहे. रात्रीची 76 लाख मतं वाढली त्याचा हिशोब का देत नाही? असा सवाल पटोले यांनी विचारला.

तसेच ही सत्ता येईल जाईल पण लोकशाही टिकली तर सारं काही राहिल. या सगळ्या गोष्टींची जाणीव आपण ठेवली पाहिजे. ही काही आरोप प्रत्यारोपाची वेळ नाही. मारकडवाडीच्या लोकांनी जी भुमिका घेतली आहे ती खऱ्या अर्थाने देशातल्या प्रत्येक मतदाराचा आवाज ते बनलेले आहेत. त्याचे समर्थन करण्याची गरज आहे. ही लोकशाहीला वाचवण्याची लढाई असून यात सर्वांनी सामील झाले पाहिजे ही आमची भुमिका आहे असेही पटोले म्हणाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;