अजितदादा भैसाटले… आर. आर. पाटलांवर भयंकर आरोप

अजितदादा भैसाटले… आर. आर. पाटलांवर भयंकर आरोप

पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजप नेत्यांनी अनेकदा अजित पवारांवर 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचे आरोप केले आहेत. मात्र, आता भाजपबरोबर सत्तेत वाटेकरी झाल्यामुळे अजितदादांना याचा विसर पडला असून, आज तासगांव येथील जाहीर सभेत बोलताना तर ते पूर्णपणे भैसाटले. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्यावर त्यांनी गंभीर आरोप केले. ‘सिंचन घोटाळा चौकशीच्या फाइलवर तत्कालीन गृहमंत्री असलेल्या आबांनी स्वाक्षरी केली होती. आबांनी केसानं गळा कापला,’ असे विधान अजितदादांनी केले आहे. ही फाइल मला देवेंद्र फडणवीस यांनी दाखवली असे त्यांनी सांगितले.

तासगांव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, महाविकास आघाडीचे उमेदवार रोहित पाटील रिंगणात आहेत. रोहित पाटील हे आर. आर. आबांचे पुत्र आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार गटाने संजयकाका पाटील यांना उमेदवारी दिली आहे. संजयकाकांना भाजपमधून आयात केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज तासगांवमध्ये प्रचारसभा झाली. यावेळी सिंचन घोटाळा चौकशीवरून दिवंगत नेते आर. आर. आबा पाटील यांच्यावर बेछूट आरोप केले. केवळ मला बदनाम करण्यासाठी 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचे आरोप केले गेले, असा दावा करताना अजित पवार म्हणाले, महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून सरकारी कर्मचाऱयांचा आणि इतर खर्च 42 हजार कोटी एवढा होता. मग 70 हजार कोटींचा घोटाळा कुठून होणार? पण आकडाच इतका मोठा होता की त्यातून माझी बदनामी झाली.

गृहमंत्रीपद किती वेळा मागितले

मला एकदा तरी गृहमंत्रीपद द्या, असं मी कित्येकदा माझ्या नेत्यांना सांगायचो. बघतोच एकेकाला. बघतो म्हणजे चांगला कारभार करायला. वेडवाकडं चालू देणार नाही. मला वेडवाकडं खपतच नाही. मला गृहमंत्री करा, अशी मागणी करूनही वरिष्ठांनी माझ्या मागणीकडे दुर्लक्ष केले, असा गंभीर आरोप अजित पवार यांनी यावेळी केला.

दादांना कोणते अधिकार दिले नाहीत, तुम्हीच सांगा…

‘मी सगळा कारभार त्यांच्या हाती दिला. मी पक्षाचा अध्यक्ष होतो; पण नव्या पिढीकडे सगळे अधिकार दिले. गेली 20 वर्षे मी बारामतीत लक्ष घातले नाही. साखर कारखाने, दूध संघ, बँक, खरेदी-विक्री संघ आदी संस्थांमध्ये कोणाला संधी द्यायची याचे सर्वाधिकार त्यांना दिले. चारदा उपमुख्यमंत्रीपदाची संधी दिली. तरी त्यांनी पहाटे सहालाच तिकडे जात शपथ घेतली. अनेकांना झोपेतून उठवून तिकडे नेले. परिणाम काय झाला, अवघ्या चार दिवसांत पद गेले. त्यांच्या मदतीने कशासाठी पद घेतले हे समजत नाही. नंतरच्या काळात तर पक्षच घेऊन दुसरीकडे जाऊन बसले. त्यातून त्यांना पद मिळाले, पण या आधीसुद्धा मिळाले होतेच ना, असे शरद पवार म्हणाले. मी राज्यात अनेकांना मंत्री केले, उपमुख्यमंत्री केले. एकदाही सुप्रियाला पद दिले नाही. बाकीच्यांना पदे दिली. लोकशाहीत लोकांची सेवा करण्यासाठी पद लागते. लोकांनी साथ दिली नाही तर आपण सुधारणा करून लोकांच्या मनात स्थान निर्माण करून सत्ता प्राप्त केली पाहिजे, असे शरद पवार म्हणाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;