शॉर्टकट दर्शनासाठी मिंधे गटाची घुसखोरी! मंत्री उदय सामंत यांचे पत्र; पंढरपुरात वारकऱ्यांमध्ये संतापाची लाट

शॉर्टकट दर्शनासाठी मिंधे गटाची घुसखोरी! मंत्री उदय सामंत यांचे पत्र; पंढरपुरात वारकऱ्यांमध्ये संतापाची लाट

श्री विठ्ठलाचा धावा करत ऊन, वारा, पावसात शेकडो मैलांचे अंतर चालत येऊन देवाच्या पदस्पर्श दर्शनासाठी वारकरी 10-12 तास दर्शनरांगेत उभे आहेत. मात्र वारकऱ्यांच्या मागे लागलेले मिंध्यांचे शुक्लकाष्ठ संपण्याचे नाव घेत नाही. मंदिर समितीने व्हीआयपी दर्शन बंद केले आहे. मात्र बुधवारी मिंधे गटाचे खासदार संदीपान भुमरे यांनी शॉर्टकट दर्शनासाठी घातलेला गोंधळ शांत होत नाही तोच आता उद्योग मंत्री उदय सामंत यांची घुसखोरी पुढे आली आहे. आपल्या खात्यातील अधिकाऱ्यासह त्यांच्या कुटुंबातील सात जणांची प्राधान्याने आषाढी एकादशीला श्री विठ्ठलाच्या दर्शनाची व्यवस्था करावी, असे पत्रच सामंत यांनी मंदिर समितीला दिले आहे. या प्रकारामुळे वारकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

आषाढी एकादशीचा सोहळा 17 जुलै रोजी आहे. आषाढी एकादशीला तर वारकरी-भाविकांची संख्या 15 लाखांवर जाते. त्या वेळी दर्शनासाठी 30-40 तासांचा कालावधी लागतो. त्यात वयोवृद्ध वारकरी, महिलांची संख्या मोठी असते. मात्र शासनकर्तेच घुसखोरी करून व्हीआयपी दर्शन घेताना दिसत आहेत. त्यामुळे वारकरी संतप्त आहेत.

व्हीआयपी दर्शन बंद तरी घुसखोरी

वारीच्या काळात मंदिर समितीच्या अधिकाऱ्यांना शेकडो फोन हे व्हीआयपी दर्शन घडवा यासाठी येत असतात. त्यामुळे अधिकारी फोन बंद ठेवतात. या सगळ्या त्रासाला कंटाळून मंदिर समितीने व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र मिंधे गटाचे खासदार संदीपान भुमरेंनी गोंधळ घालून निर्णयाला मोडता घातला. आता मंत्री उदय सामंत यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला आहे.

उदय सामंत यांचे पत्र काय आहे…

‘‘नितीन सवडतकर हे माझ्या आस्थापनेवर या विकास पदावर कार्यरत असून ते सहकुटुंब (एकूण 7 व्यक्ती) 17 जुलै रोजी पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रखुमाई देवदर्शनाकरिता येणार आहेत. प्राधान्याने त्यांची दर्शन व्यवस्था करावी,’’ असे मंत्री उदय सामंत यांची सही-शिक्का असलेले पत्र सोलापूर जिल्हाधिकारी आणि देवस्थान समितीकडे आले आहे. या पत्राची माहिती मिळताच वारकऱ्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

गोरगरीब वारकऱ्यांवर अन्याय करू नका, अन्यथा…

मंत्री महोदय माणुसकीचे भान ठेवा, सत्ता आहे म्हणून तुम्ही गोरगरीब भाविकांवर अन्याय करणार असाल तर वारकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून वेगळा निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा विश्व वारकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष हभप अरुण महाराज बुरघाटे यांनी दिला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;