गरीबांच्या धान्यावर सरकारी कर्मचाऱयांचा डल्ला, सरकारची कबुली

गरीबांना जगण्यासाठी दोन वेळचे अन्न मिळावे या उद्देशाने राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतून धान्य पुरवठा केला जातो. त्या धान्यावर राज्यातील एक लाखाहून अधिक सरकारी कर्मचाऱयांनी डल्ला मारल्याची कबुली राज्य शासनाने आज विधानसभेत दिली. या कर्मचाऱयांवर गुन्हे दाखल करून कारवाई करण्याची मागणी विरोधकांनी सभागृहात लावून धरली. त्यावर यासंदर्भात चौकशी करून संबंधित कर्मचाऱयांवर कारवाई केली जाईल असे आश्वासन अन्न व नागरीपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिले.

जळगाव जिह्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेमध्ये होत असलेल्या गैरव्यवहाराचा मुद्दा आमदार संजय सावकारे यांनी तारांकित प्रश्नाद्वारे सभागृहात उपस्थित केला होता. गरीबांसाठी असलेल्या या योजनेचा लाभ शासकीय व निमशासकीय कर्मचारी घेत असल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणले. याप्रकरणी शासनाने कोणती कारवाई केली अशी विचारणा त्यांनी केली. तसेच शासकीय कर्मचाऱयांची या योजनेसाठी नोंद करणाऱया सेतू पेंद्रांवर कारवाई करणार का, असा प्रश्न विचारला.

कारवाईचे निर्देश देणार – छगन भुजबळ

छगन भुजबळ यांनी त्यावर उत्तर देताना सांगितले की, अन्नसुरक्षा योजनेचा लाभ घेण्यासाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा शहरांमध्ये 59 हजार रुपये, तर गावांमध्ये 44 हजार रुपये आहे. एक लाख 262 शासकीय कर्मचारी या योजनेचा लाभ घेत असल्याचे दिसून आले आहे. त्यात दारिद्रय़ रेषेवरील 63 हजार 794 कर्मचाऱयांचा समावेश असून त्यातील 30 हजार 353 कर्मचारी वर्ग-3 मधील आहेत, अशी माहिती भुजबळ यांनी दिली. संबंधित विभागांना त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.

फसवणुकीचे गुन्हे दाखल करा – बच्चू कडू

गरीबांचे धान्य खाऊन शासकीय कर्मचाऱयांनी शासनाची फसवणूक केली असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. तसेच दिव्यांग आणि विधवा महिलांनाही या योजनेत सहभागी करून घ्यावे अन्यथा त्यांच्यासाठी राज्याची स्वतंत्र योजना राबवा, अशी मागणी प्रहार जनशक्ती पार्टीचे आमदार बच्चू कडू यांनी केली.

सीआरमध्ये नोंद करा – पृथ्वीराज चव्हाण

गरीबांचे अन्न शासकीय कर्मचारी खातायंत ही अत्यंत धक्कादायक बाब असल्याचे काँग्रेस आमदार पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. सध्या एकाही शासकीय कर्मचाऱयाला वार्षिक 70 हजार रुपयांपेक्षा कमी पगार नाही. कायदा माहीत असतानाही त्यांनी त्याचे उल्लंघन करून गरीबांच्या तोंडचे अन्न पळवले. सरकार त्यांना निलंबित करणार नाही याची आम्हाला कल्पना आहे, पण त्यांच्या सीआरमध्ये त्याची नोंद करावी, अशी मागणी केली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;