शेवगाव तालुक्यात पाण्याअभावी भाजीपाला काढून टाकण्याची वेळ
शेवगाव तालुक्यात गेल्या वर्षी अत्यल्प पाऊस झाल्यामुळे पाणीसाठे संपुष्टात येऊ लागले आहेत. विहिरी आणि कूपनलिका आटल्या आहेत. त्यामुळे शेतकऱयांनी भाजीपाल्याची लावलेली पिके जळून जाऊ लागली आहेत. त्यातच बाजारभाव नसल्यामुळे शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी, दहिगावने परिसरातील शेतकऱ्यांवर भाजीपाला काढून टाकण्याची वेळ आली आहे.
शेवगाव तालुक्यातील देवटाकळी व परिसरातील पाझर तलाव व साठवण तलावातील पाणीसाठा खालावला आहे. नदी-नाले पूर्णपणे कोरडे पडले आहेत. शेत शिवारातील विहीर व विंधन विहिरींचे पाणी आटले आहे. जोहरापूर, खामगाव, हिंगणगाव, देवटाकळी, बक्तरपूर, मजलेशहर, भायगावसह परिसरातील शेतकऱयांनी आपल्या शेतात मोठय़ा प्रमाणात भाजीपाला लागवड केली आहे.
पाणीसाठा अत्यल्प असल्यामुळे शेतशिवारातील भाजीपाला जगवणे शेतकऱयांना जिकिरीचे झाले आहे. त्यात पिकविलेला टोमॅटो, कोथिंबीर, वांगी, भेंडी, मिरची शेतकरी बाजारपेठेत विक्रीसाठी घेऊन जातात. मात्र, भाव मिळत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. भाजीपाला लागवडीपासून आतापर्यंत झालेला खर्चही आजपर्यंतच्या उत्पन्नात निघाला नाही. पुढील काळात तर लागणारा खर्च कमी व्हावा, या हेतूने शेतकरी शेती शिवारातून भाजीपाला काढून टाकण्याच्या मनःस्थितीत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List