गायरान जमिनीवरील अतिक्रमणे हटवा! शेतकऱयांची हायकोर्टात धाव; मिंधे सरकारला नोटीस

गायरान जमिनीवरील अतिक्रमणे हटवा! शेतकऱयांची हायकोर्टात धाव; मिंधे सरकारला नोटीस

गायरान जमिनीवरील अनधिकृत बांधकामे हटवा, अशी मागणी करीत नाशिक जिह्यातील शेतकऱयांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने शेतकऱयांच्या जनहित याचिकेची गंभीर दखल घेतली आणि मिंधे सरकारसह जिल्हा पातळीवरील इतर प्रतिवादींना नोटीस बजावली. याचिकेवर 7 मे रोजी सुनावणी होणार आहे.

येवला तालुक्यातील पैलास सोमसे व इतर शेतकऱयांनी अॅड. एकनाथ ढोकळे यांच्यामार्फत ही जनहित याचिका दाखल केली आहे. मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर प्राथमिक सुनावणी झाली. यावेळी सरकारी वकिलांनी अतिक्रमणांवरील कारवाईबाबत भूमिका स्पष्ट करण्यासाठी ग्रामीण स्तरावरील प्रशासनांना सूचना केल्याचे कळवले. त्याआधारे खंडपीठाने तातडीने सुनावणी घेण्यास तयारी दर्शवली आणि सरकारचे स्पष्टीकरण ऐकण्यासाठी पुढील सुनावणीची तारीख निश्चित केली. या याचिकेमुळे नाशिक जिह्यासह राज्याच्या विविध भागांतील गायरान जमिनींवरील अतिक्रमणांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येण्याची शक्यता आहे.

याचिकेत काय म्हटलेय? 

येवला तालुक्यातील डोंगरगाव येथील जवळपास 8.09 हेक्टर गायरान जमिनीवर अतिक्रमणे उभी आहेत. राजकीय प्रभावाचा वापर करून कायमस्वरूपी दुकानेही बांधली आहेत.

गावकऱयांनी अतिक्रमणांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी करीत वेळोवेळी प्रशासनाकडे तक्रारी दिल्या, मात्र जाणूनबुजून कारवाईला टाळाटाळ करण्यात आली आहे. त्यामुळे गायरान जमिनी अतिक्रमणांसाठी मोकळे रान बनल्या आहेत.

महाराष्ट्र ग्रामपंचायत कायद्याच्या कलम 53 अंतर्गत अधिकाराचा वापर करून स्थानिक प्रशासनाने गायरान जमिनी अतिक्रमणमुक्त कराव्यात. याबाबत न्यायालयाने निर्देश द्यावेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मागील १५ वर्षांत मी काम केलं, अन् त्यांनी ५ वर्षात फक्त कामाचा अभिनय केला मागील १५ वर्षांत मी काम केलं, अन् त्यांनी ५ वर्षात फक्त कामाचा अभिनय केला
मागील पाच वर्षात अमोल कोल्हे यांनी एकही प्रकल्प आपल्या भागात आणला आही.  जी कामं ते आपल्या सोशल मिडियावर दाखवत असतात,...
शिरूरमध्ये आढळराव पाटलांसाठी सुनबाई मैदानात, हडपसर मतदारसंघात नागरिकांशी साधला संवाद
‘शिवा’ मालिकेत अखेर तो क्षण आलाच; प्रपोजलला काय असेल आशुचं उत्तर?
जेंव्हा सावत्र बहीण ईशाच्या लग्नाला नव्हते पोहचले सनी आणि बॉबी देओल, धर्मेंद्र यांनी रागाच्या भरात थेट..
मला सांगताना खूप वाईट वाटतंय..; गौरव मोरेनं जाहीर केला मोठा निर्णय
नवरा मारून टाकेल या भीतीने अभिनेत्री करायची असं काम, पती आहे प्रसिद्ध उद्योजक
मराठीच तुरळक सिनेमे केले अन् आज मराठीचा मुद्दा..; रेणुका शहाणेंच्या पोस्टवर नेटकऱ्यांचे कमेंट्स