विकेंडपासून तीन दिवस सूर्य आग ओकणार!

विकेंडपासून तीन दिवस सूर्य आग ओकणार!

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून वाढलेला पाऱ्याचा तोरा विकेंडपासून तीन दिवस कायम राहणार असून तापमान 37 ते 38 अंशांवर जाणार आहे. त्यामुळे शनिवार, रविवार आणि सोमवारी उकाडा आणखी वाढणार असल्याने मुंबईकरांनी आवश्यक काळजी घ्यावी, असे आवाहन कुलाबा वेधशाळेकडून करण्यात आले आहे.

मुंबई-महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून तापमानाचा पारा चाळिशी ओलांडत आहे. काही ठिकाणी पाऱ्याने 42 अंशांपर्यंत मजल मारली आहे. मुंबईतही उकाडा प्रचंड वाढल्यामुळे तापमानात वाढ झाल्यामुळे उष्माघात झाल्यास रुग्णांवर वेळीच उपचार करण्यासाठी पालिकेच्या केईएम नायर सायन व कूपर रुग्णालयात कोल्ड रूम तैनात करण्यात आले आहेत. यातच पुन्हा तापमान वाढ होण्याचा अंदाज कुलाबा हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे एप्रिल अखेरीस वाढत्या तापमानामुळे मुंबईकरांचा घामटा निघणार आहे. दरम्यान, शनिवार, रविवार व सोमवारी पारा चढा असणार असल्याने गरज नसल्यास दुपारी 12 ते सायंकाळी 4 या वेळेत घरातून बाहेर पडू नये, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.

म्हणूनच वाढणार तापमान

उत्तरेकडील वारे वाहू लागल्याने मुंबई व परिसरातील तापमानात वाढ होते. उत्तरेकडील वारे वाहू लागल्याने गरम हवा एकाच जागी रोखते आणि गरम हवा एकाच ठिकाणी जमा होते. गरम हवेला रोखण्यासाठी काही उपाय नसल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले.

मुंबईकरांनो, काळजी घ्या

मुंबई, ठाणे, रायगडमध्ये 35 ते 40 अंश सेल्सियस इतक्या तापमानाची नोंद झाली. सकाळी 11 ते दुपारी 4 दरम्यान कडक उन असल्याने शक्यतो घराबाहेर पडू नये. भरपूर पाणी प्यावे, लहान मुलांना उष्माघाताचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे त्यांना घराबाहेर नेऊ नये. शाळेत जाताना डोक्यावर टोपी आणि महिलांनी डोक्याभोवती स्कार्फ गुंडाळावा, असे आवाहन मुंबई हवामान विभाग आणि डॉक्टरांनी केले आहे

कशामुळे उष्णतेची लाट?

गुजरात आणि राजस्थान येथून उष्ण वारे वाहत असून ते अरबी समुद्रावरून मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, कोकण किनारपट्टी येथे धडकत आहेत. समुद्रावरून वारे वाहत असल्याने ते आर्द्रतायुक्त बनत असून असह्य उकाडा जाणवत आहे. आज मुंबईत अनेक ठिकाणी 34 ते 35 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. शनिवारपासून काही ठिकाणी तापमानाच वाढ होईल असा अंदाज कुलाबा वेधशाळेच्या वैज्ञानिक सुषमा नायर यांनी व्यक्त केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;