सांगलीतून मागणी वाढल्याने कोयनेचा विसर्ग वाढविला
सांगली जिह्यातील सिंचनासाठी पाण्याची मागणी काढल्यामुळे कोयना धरणातून विसर्ग वाढविण्यात आला आहे. त्यानुसार विमोचक द्वारमधून आता 1200 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे सांगलीसाठी आता पायथा कीजगृह आणि विमोचक द्वार असा मिळून 3300 क्युसेकने विसर्ग सुरू झाला आहे. कोयना धरणात सध्या 43 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.
कोयना धरणाची पाणी साठकण क्षमता 105.25 टीएमसी आहे. या धरणातील पाण्याकर वीजनिर्मिती केली जाते. तसेच सिंचन आणि पिण्याच्या पाणी योजनांसाठीही धरणातून किसर्ग केला जातो. यामध्ये सांगली जिह्यातील अधिक करून सिंचन पाणी योजनांचा समावेश आहे. त्यातच गेल्या कर्षी सातारा जिह्यात अपुरे पर्जन्यमान झाले होते. कोयना धरण पाणलोट क्षेत्रातही पावसाचे प्रमाण कमी राहिले. त्यामुळे धरण भरले नक्हते. धरणातील पाणीसाठा 95 टीएमसीपर्यंतच पोहोचलेला. त्यामुळे गेल्याकर्षी नोक्हेंबर महिन्यापासून सांगली जिह्यातील सिंचनासाठी पाण्याची मागणी होत होती. मागणी आणि तरतुदीनुसार सांगलीसाठी पाणी सोडण्यात येत आहे. मागील पाच महिन्यांपासून हे पाणी मागणीनुसार सोडले जात आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List