मरो त्याचे दुश्मन…, धर्मेंद्र यांच्या निधनाच्या बातम्यांवर अभिनेते शत्रुघ्न सिन्हा संतापले

मरो त्याचे दुश्मन…, धर्मेंद्र यांच्या निधनाच्या बातम्यांवर अभिनेते शत्रुघ्न सिन्हा संतापले

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची तब्येत नाजूक असून ते सध्या ब्रीच कॅण्डी रुग्णालयात उपचार घेत आहेत. या दरम्यान, धर्मेंद्र यांच्या निधनाच्या बातम्या समोर आल्या. त्यानंतर धर्मेंद्रचे जवळचे मित्र अभिनेते शत्रुघ्न सिन्हा नाराज झाले आहेत. ते म्हणाले विश्वासू पोर्टल्सवर बातम्या पाहून त्यांनाही निधनाची बातमी खरी वाटली. मात्र, नंतर त्यांना निधनाची बातमी खोटी असल्याचे कळले.

बॉलीवूड हंगामाशी बातचीत करताना शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की, ”मी सकाळी उठल्यावर बातम्या पाहिल्या आणि खरे वाटले. कारण विश्वासू पोर्टस्स आणि पब्लिकेशन्सवर धर्मेंद्र यांच्या निधनाच्या बातम्या दाखवण्यात आल्या. पण काही क्षणात काहीसा दिलासा मिळाला. कारण या बातम्या खोट्या होत्या. धरमजी ठीक आहेत आणि लवकरच ते घरी असतील. मरो त्यांचे दुश्मन, असे शत्रुघ्न सिन्हा म्हणाले.

शत्रुघ्न पुढे म्हणाले, जे अशाप्रकारच्या बातम्या पसरवत आहेत, ते आहेत तरी कोण? धरमजी यांच्याकडे कोणतीही टीम नाही. मग कोणत्या टीमकडून या बातमीला दुजोरा मिळाला आहे? हे अजिबात बरोबर नाही. शत्रुघ्न सिन्हा आणि धर्मेंद्र पाच दशकांपासून एकमेकांचे मित्र आहेत. शत्रुघ्न सांगतात, ”धर्मेंद्र आणि हेमा मला खूप आवडतात. आम्ही तिघांनीही आमच्या सर्वोत्तम सिनेमापैकी गुलाल गुहा यांच्या ‘दोस्त’ सिनेमात एकत्र काम केले आहे. आम्हाला तिघांना जितके भेटायला हवे होते तितके भेटता येत नाही. मात्र, जेव्हा भेटतो तेव्हा खूप गप्पा मारतो, खातो-पितो आणि संगीत ऐकतो” असेही ते म्हणाले.

देओल यांची तिसरी पिढी सिनेसृष्टीत आली आहे. याबाबत शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की,”माझा मित्र निरोगी आयुष्य जगो अशी मी प्रार्थना करतो. त्याच्याकडे अभिमान बाळगण्यासारखे बरेच काही आहे. आता तर त्यांची नातवंडे देखील अभिनेते झाले आहेत. देओल कुटुंबाच्या तीन पिढ्यांनी आपल्या चित्रपटसृष्टीत प्रवेश केला आहे. ही काही छोटी कामगिरी नाही.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई; मुंब्रा येथून शिक्षकाला अटक; चार घरांवर छापेमारी महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई; मुंब्रा येथून शिक्षकाला अटक; चार घरांवर छापेमारी
दिल्लीमध्ये झालेल्या स्फोटाच्या घटनेनंतर देशातील सर्वच सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. याचदरम्यान महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) धडक कारवाईची मोहिम...
दापोलीत धनशक्तीचा जनशक्ती पराभव करणार; भास्कर जाधव यांचा विश्वास
Mumbai News – एक्स बॉयफ्रेडच्या त्रासाला कंटाळून तरुणीने संपवले जीवन, घाटकोपरमधील धक्कादायक घटना
तुर्कीचे लष्करी मालवाहू विमान जॉर्जियामध्ये कोसळले, बचाव कार्य सुरू
12 वर्षे जुना डायबिटीज झाला गायब,न्यूट्रीशनिस्टने सांगितले हे जालीम 3 उपाय, औषधे झाली बंद
Bihar Election 2025 – शेवटच्या टप्प्यात संध्याकाळी ५ पर्यंत विक्रमी ६७.१४ टक्के मतदान; निवडणुकीचा निकाल शुक्रवारी, उमेदवारांची धाकधूक वाढली
Chhatrapti Sambhaji Nagar News – वडोद बाजार पोलिसांनी घडवले माणुसकीचे दर्शन