सोडून जातो गाव रे…!! रोहयोची कामे तुटपुंजी.. हाताला काम नाही, हजारो मजुरांचे तांडे शहराकडे निघाले; गावे ओस पडू लागली

सोडून जातो गाव रे…!! रोहयोची कामे तुटपुंजी.. हाताला काम नाही, हजारो मजुरांचे तांडे शहराकडे निघाले; गावे ओस पडू लागली

दिवाळी झाली आणि खरीप हंगामाची कामेही अंतिम टप्प्यात आहेत. मोखाड्यात शेती व्यतिरिक्त दुसरे कुठलेही रोजगाराचे साधन नाही. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना (रोहयो) हीच मजुरांच्या हात कामाला देणारी एकमेव सरकारी योजना आहे. मात्र मोखाडा तालुक्यात सरकारी यंत्रणांनी तुटपुंजी कामे सुरू केल्याने आदिवासींच्या हाताला काम नाही. त्यामुळे रोजगारासाठी ‘सोडून जातो गाव रे’ असे म्हणत हजारो मजुरांचे तांडे शहराकडे निघाले आहेत. त्यामुळे गावे ओस पडू लागली आहेत.

पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात खरीप हंगामाचे पीक हेच एकमेव रोजगाराचे साधन आहे. या व्यतिरिक्त शासनाची महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना ही एकमेव शाश्वत रोजगार देणारी योजना आहे. प्रतिवर्षी याच योजनेवर बेरोजगार आदिवासी मजुरांना, रोजगारासाठी अवलंबून राहावे लागते. यंदा ओल्या दुष्काळामुळे खरीप पिकाची माती झाली. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर हतबल झाले.

34 हजारांपैकी केवळ 1129 मजुरांना काम
मोखाडा तालुक्यात 33 हजार 844 कुटुंबांतील 73 हजार 463 जॉबकार्ड धारक मजूर संख्या आहे. सरकारी आकडा 34 हजार 245 मजुरांचा आहे. दरवर्षी 2 ऑक्टोबर महात्मा गांधींच्या जयंती दिनाला रोजगार हमी योजना सुरू होते. मात्र सरकारी यंत्रणांच्या कामचुकार धोरणामुळे सवा महिन्याच्या कालावधीत केवळ 1129 मजुरांना रोजगार मिळाला आहे. त्यामुळे हजारो बेरोजगार मजुरांनी स्थलांतराचा मार्ग अवलंबला आहे.

काम करून सहा महिने झाले तरी मजुरी नाही
कृषी खात्याचे खात्रीचे काम आठवडाभर केले आहे. काम करून सहा महिने झाले आहेत. मात्र या कामाची मजुरी अजूनही मिळालेली नाही. काम करून वेळेत मजुरी मिळत नाही, मग जगायचे कसे? वेळेत मजुरी मिळत नाही म्हणून आम्ही रोजगार हमी योजनेच्या कामांवर जात नाही. मिळेल ते काम येथे करतो. नाहीतर शहराकडे कामाला जातो, अशी अगतिकता खोडाळा येथील मजूर प्रमोद हमरे यांनी व्यक्त केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बकरीच्या दुधाचे फायदे माहिती आहेत का? जाणून घ्या सर्व काही… बकरीच्या दुधाचे फायदे माहिती आहेत का? जाणून घ्या सर्व काही…
गायी, म्हशीचे दूध पिणे सामान्य गोष्ट आहे. पण अनेकजण बकरीचे दूधही पितात. याशिवाय ते आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. बकरीचे दूध...
हिवाळ्यात उत्तम आरोग्यासाठी हळदीसोबत हे पदार्थ खायलाच हवेत
सत्तेसाठी तीन साप एकत्र येऊन एकमेकांना गिळू पाहताहेत, जनतेकडे कोण पाहणार… उद्धव ठाकरे यांनी फटकारले
Renuka Shahane: तुला महिन्याला स्टायपेंड देईन,पण माझ्यासोबत…; रेणुका शहाणेंने केली निर्मात्याची पोलखोल
Delhi Bomb Blast – लखनौतील महिला डॉक्टर शाहीनच्या गाडीत सापडली AK-47! दिल्ली बाॅम्बस्फोटाशी तिचेही कनेक्शन
मोहम्मद शमीसंदर्भात सौरव गांगुलीचे महत्त्वाचे विधान, सिलेक्टर्सना दिला सल्ला
सुरक्षेच्या कारणास्तव लाल किल्ला तीन दिवस राहणार बंद, दिल्लीचे अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद