अखेर त्या नरभक्षक बिबट्याला केले ठार, नागरिकांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

अखेर त्या नरभक्षक बिबट्याला केले ठार, नागरिकांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

आंबेगाव, शिरूर आणि जुन्नर परिसरात गेल्या काही वर्षांपासून बिबट्याची मोठ्या प्रमाणावर दहशत निर्माण झाली आहे, जांबुत येथील रोहन बोंबे या 13 वर्षीय विद्यार्थ्यांवर बिबट्याने हल्ला करून ठार केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी आंदोलन केले. अखेर लोकांच्या आक्रोशानंतर बिबट्याला ठार करण्याची परवानगी मिळाली व मंगळवारी रात्री एका बिबट्याला ठार करण्यात यश आले आहे. पिंपरखेड (ता. शिरूर) परिसरात वनविभागाने राबवलेल्या नियोजनबद्ध मोहिमेत नर बिबट्याला गोळी घालून ठार करण्यात यश आले. या कारवाईनंतर नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

मागील दीड ते दोन महिन्यात बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये चार निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे परिसरात भीतीचं आणि अस्वस्थतेचं वातावरण निर्माण झालं होतं. नागरिकांकडून वारंवार ठोस कारवाईची मागणी होत होती. यासाठी पिंपरखेड, जांबुत परिसरातील ग्रामस्थ यांनी मंचर जवळील भोरवाडी येथील नंदी चौकात पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले होते. जनतेचा वाढता पहाता नागपुर प्रधान मुख्य वनसंरक्षक यांनी बिबट्याला ठार मारण्याची परवानगी देण्यात आली होती. परवानगी मिळाल्यानंतर वनविभागाने विशेष पथक तयार करून बिबट्याला ठार करण्यासाठी शार्प शूटर टीम पाठवण्यात आली होती पिंपरखेड परिसरात बिबट्याची शोध मोहीम राबवून रात्री पिंपरखेड परिसरात त्या नर बिबट्याला ठार करण्यात आले आहे. गेल्या दहा वर्षांत प्रथमच अशा प्रकारे बिबट्याला ठार मारण्याची कारवाई करण्यात आली आहे. वनविभागाच्या या मोहिमेत स्थानिक पथकासोबत तज्ज्ञ शूटरचाही सहभाग होता.

दरम्यान, गेल्या काही दिवसांत वनविभागाने एकूण दहा बिबट्यांना जेरबंद करण्यात यश मिळवलं आहे. या सलग कारवायांमुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या संदर्भात सहायक वनसंरक्षक अधिकारी स्मिता राजहंस म्हणाल्या, “गेल्या काही दिवसांपासून वनविभागाचे कर्मचारी सतत भीतीच्या वातावरणात काम करत आहेत. मात्र, त्यांनी मोठ्या हिमतीने मोहिम पार पाडली. नागरिकांचा जीवितहानीचा धोका टळावा यासाठी पुढील काही दिवस विभाग परिसरात गस्त आणि शोधमोहीम सुरू ठेवणार आहे.”

बिबट्याला ठार मारल्यानंतर वनविभागाने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पुढील अहवाल सादर केला आहे. स्थानिक ग्रामस्थांनी वनअधिकाऱ्यांचे आभार मानत या कारवाईचे स्वागत केले आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

दारू प्यायल्याने खरंच थंडी वाजत नाही? नेमकं सत्य काय? वाचा… दारू प्यायल्याने खरंच थंडी वाजत नाही? नेमकं सत्य काय? वाचा…
थंडीत नेहमी ड्रींक घेण्याने थंडी पळून जाईल असा सल्ला दिला जात असतो. परंतू मद्यामुळे खरंच थंडी गायब होते का? की...
मतदार यादीतील घर क्रमांक ‘शून्य’ची नेमकी भानगड काय आहे?
हैदराबाद बस अपघात प्रकरण, राज्य मानव आयोगाने दखल घेत मागवला अहवाल
Raigad News – घाटातील साईट पट्टीचा अंदाज आला नाही, दुचाकी 100 फूट खाली कोसळली; एकाचा जागीच मृत्यू
कुलाबा कॉजवेतून 67 अनधिकृत फेरीवाल्यांना हटवले, पालिकेची धडक कारवाई
India Vs SA Test Series – दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, ऋषभ पंतचं कमबॅक
हार्दिक पांड्या दुसऱ्यांदा प्रेमात, ‘तो’ व्हिडीओ झाला व्हायरल….