शेतकरी म्हणून एकवटा, तुमची वज्रमूठ दाखवा आणि हे सरकार… उद्धव ठाकरे यांचे शेतकऱ्यांना आवाहन

शेतकरी म्हणून एकवटा, तुमची वज्रमूठ दाखवा आणि हे सरकार… उद्धव ठाकरे यांचे शेतकऱ्यांना आवाहन

मराठवाड्यातील अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्यापासून मराठवाडा दौऱ्यावर आले आहेत. बुधवार सकाळपासून सुरू झालेल्या या दौऱ्यात सर्वप्रथम उद्धव ठाकरे यांनी पैठण तालुक्यातील नांदर येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी त्यांना जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांसोबत राहणार असे आश्वासन दिले. तसेच त्यांनी जर सरकार कर्जमुक्ती करत नसेल तर शेतकरी म्हणून तुम्ही सर्वांनी एकवटलं पाहिजे व त्यांना आपली वज्रमूठ दाखवून हे सरकारच ताब्यात घेतलं पाहिजे, असे आवाहन देखील केले.

”मी राजकीय प्रचार करायला आलेलो नाही. तुम्ही सर्वजण आता त्या सगळ्याला कंटाळला आहात. निवडणूका आल्या की आम्ही राजकीय नेते येतो व तुमच्या कोपराला गूळ लावून जातो. तुम्ही भोळे भाबडे आपलं आयुष्य कुणाला तरी देऊन टाकता. महाराष्ट्र व मराठवाड्यावर आपत्तीमागून आपत्ती येत आहे. पाऊस थांबायचं नाव घेत नाहीए. कधी नव्हे ते एवढं मोठं संकट मराठवाड्याने अनुभवलं. मराठवाडा हा अवर्षणग्रस्त भाग आहे. एवढा पाऊस कधी पाहिला नाही असं अनेकांनी सांगितलं. मी मोठा पाऊस झाला तेव्हाही आलेलो. तेव्हा माझ्या दौऱ्याची टिंगल केली गेली. तेव्हाही शेतकऱ्यांशीच बोललो. शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मिळाले पाहिजे, कर्जमुक्ती झाली पाहिजे ही मागणी केली होती. आताही माझी तिच मागणी आहे. खरीप तर गेलं आहे. रब्बी देखील आता गेलं आहे. जमीनच खरडून गेली आहे. मग कसं घेणार तुम्ही पिकं? या दयावान सरकारचा अभ्यास सुरू आहे. मी मुख्यमंत्री असताना मी सरसकट कर्जमुक्ती केली होती. मी माझं कर्तव्य म्हणून केलं होतं. त्यावेळी मी कर्जमुक्ती करून दाखवली होती तेव्हा सगळी माहिती सरकार दरबारी जमा आहे. सर्व यंत्रणा सरकारकडे आहे. कर्जमुक्ती साठी आम्ही महात्मा फुले ही सरकारी योजना राबवली होती. तिची संपूर्ण माहिती सरकारकडे आहे. मग कसला अभ्यास करतायत हे? असा खणखणीत सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

“दिल से… माधुरी” शोसाठी 3 तास उशिरा पोहोचली माधुरी; नेटकऱ्यांनी सुनावलं “दिल से… माधुरी” शोसाठी 3 तास उशिरा पोहोचली माधुरी; नेटकऱ्यांनी सुनावलं
बॉलीवूडची धकधक गर्ल, सुप्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. कॅनडातील टोरंटो येथे “दिल से… माधुरी” हा शो...
पुणे महापालिका सहा एसटीपींच्या निविदांमध्ये सल्लागार कंपनीकडून आकडेवारीत गोलमाल ! 
सरकारने लवकर कर्जमुक्ती केली नाही तर महाराष्ट्रातील शेतकरी रस्त्यावर उतरून सरकारचा चक्काजाम करणार; उद्धव ठाकरे यांचा इशारा
पौर्णिमेच्या स्नानासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला, रेल्वेच्या धडकेत 8 जणांचा मृत्यू
शेतकरी म्हणून एकवटा, तुमची वज्रमूठ दाखवा आणि हे सरकार… उद्धव ठाकरे यांचे शेतकऱ्यांना आवाहन
मुंबईने बीजिंग आणि शांघायला टाकले मागे; आशियातील सर्वात आनंदी शहरात पटकावले अव्वलस्थान
वडाळा डेपोजवळ मोनोमध्ये बिघाड, ट्रायल दरम्यान झाला अपघात