‘डिजिटल स्पर्श’च होईना, सहा हजार घरकुल लाभार्थ्यांचे अनुदान लटकले

‘डिजिटल स्पर्श’च होईना, सहा हजार घरकुल लाभार्थ्यांचे अनुदान लटकले

जव्हार तालुक्यात 11 हजार 486 जणांना शासकीय घरकुल योजना मंजूर झाली आहे. घरकुल लाभार्थीना जलद, पारदर्शक व डिजिटल पद्धतीने निधी वितरित करण्यासाठी ‘एसएनए स्पर्श’ ही प्रणाली वापरण्याच्या सक्त सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत. मात्र गेल्या महिनाभरापासून या नव्या पद्धतीत तांत्रिक अडचणी येत असल्याने 6 हजारपेक्षा अधिक लाभार्थी अनुदानापासून वंचित आहेत.

तालुक्यातील जवळपास सहा हजारांपेक्षा जास्त ल ाभार्थ्यांनी पदरमोड व उसनवारी करत घरकुलाचे काम पूर्णत्वाकडे नेले आहे. गेल्या महिन्यात संबंधित अभियंता यांनी प्रत्यक्ष पाहणी करत फोटो काढून ते संकेतस्थळावर अपलोडही केले. परंतु अद्याप स्पर्श प्रणालीद्वारे अनुदान वितरण झाले नाही. नव्या प्रणालीद्वारे महिनाभरात अनुदान जमा होईल, अशी माहिती गट विकास अधिकारी डी. एस. चित्ते यांनी दिली.

काय आहे नवी पद्धत ?

केंद्र पुरस्कृत योजनांचा निधी जलदरीत्या वितरणासाठी ‘एसएनए स्पर्श’चा वापर केला जात आहे. घरकुल अनुदानाचे वितरण आता या नव्या प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे. पूर्वी घरकुल लाभार्थीना पीएफएमएसद्वारे अनुदान वितरित केले जात होते. मात्र त्याऐवजी स्पर्श प्रणालीचा वापर करण्याची सूचना शासन स्तरावरून देण्यात आली आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत लाभार्थीना अनुदानाचा हप्ता मिळाला नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

“दिल से… माधुरी” शोसाठी 3 तास उशिरा पोहोचली माधुरी; नेटकऱ्यांनी सुनावलं “दिल से… माधुरी” शोसाठी 3 तास उशिरा पोहोचली माधुरी; नेटकऱ्यांनी सुनावलं
बॉलीवूडची धकधक गर्ल, सुप्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. कॅनडातील टोरंटो येथे “दिल से… माधुरी” हा शो...
पुणे महापालिका सहा एसटीपींच्या निविदांमध्ये सल्लागार कंपनीकडून आकडेवारीत गोलमाल ! 
सरकारने लवकर कर्जमुक्ती केली नाही तर महाराष्ट्रातील शेतकरी रस्त्यावर उतरून सरकारचा चक्काजाम करणार; उद्धव ठाकरे यांचा इशारा
पौर्णिमेच्या स्नानासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला, रेल्वेच्या धडकेत 8 जणांचा मृत्यू
शेतकरी म्हणून एकवटा, तुमची वज्रमूठ दाखवा आणि हे सरकार… उद्धव ठाकरे यांचे शेतकऱ्यांना आवाहन
मुंबईने बीजिंग आणि शांघायला टाकले मागे; आशियातील सर्वात आनंदी शहरात पटकावले अव्वलस्थान
वडाळा डेपोजवळ मोनोमध्ये बिघाड, ट्रायल दरम्यान झाला अपघात