देशातील एक टक्का श्रीमंतांची संपत्ती 62 टक्क्यांनी वाढली

देशातील एक टक्का श्रीमंतांची संपत्ती 62 टक्क्यांनी वाढली

हिंदुस्थानातील सर्वात श्रीमंत असलेल्या केवळ एक टक्का श्रीमंत लोकांच्या संपत्तीत तब्बल 62 टक्के वाढ झाली आहे, अशी माहिती एका रिपोर्टमधून समोर आली आहे. नोबेल पुरस्कार विजेते जोसेफ स्टिग्लिटज यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या अहवालात जागतिक असमानतेचे संकट निर्माण झाले आहे, असे म्हटले आहे. दक्षिण आफ्रिकेच्या ‘जी-20’ अध्यक्षतेमध्ये जारी करण्यात आलेल्या रिपोर्टमध्ये यासंबंधी सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

जागतिक स्तरावरील टॉपच्या एक टक्का श्रीमंत लोकांनी 2000 ते 2024 यादरम्यान सर्व नवीन संपत्तीतील 41 टक्के भाग मिळवला आहे, तर खालील अर्ध्या भागातील लोकांना केवळ एक टक्का भाग मिळवता आला. या समितीत अर्थशास्त्रज्ञ जयती घोष, विनी बयानिमा आणि इमरान वालोदिया यांचा समावेश आहे. देशात असमानता प्रचंड वाढली आहे. हिंदुस्थानात आघाडीच्या एक टक्का लोकांची संपत्ती 62 टक्क्यांनी वाढली आहे, तर हाच चीनमधीला आकडा पाहिल्यास तेथे 54 टक्क्यांनी लोकांची संपत्ती वाढली आहे. 2.3 अब्ज लोक सध्या मध्यम किंवा गंभीर खाद्य असुरक्षेचा सामना करत आहेत. 2019 च्या तुलनेत हा आकडा 33.5 कोटी अधिक आहे. जगातील अर्ध्याहून अधिक लोकसंख्या आरोग्य सेवेपासून वंचित आहे. 1.3 अब्ज लोकांकडे आरोग्यावर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत, असेही या अहवालात म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

“दिल से… माधुरी” शोसाठी 3 तास उशिरा पोहोचली माधुरी; नेटकऱ्यांनी सुनावलं “दिल से… माधुरी” शोसाठी 3 तास उशिरा पोहोचली माधुरी; नेटकऱ्यांनी सुनावलं
बॉलीवूडची धकधक गर्ल, सुप्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. कॅनडातील टोरंटो येथे “दिल से… माधुरी” हा शो...
पुणे महापालिका सहा एसटीपींच्या निविदांमध्ये सल्लागार कंपनीकडून आकडेवारीत गोलमाल ! 
सरकारने लवकर कर्जमुक्ती केली नाही तर महाराष्ट्रातील शेतकरी रस्त्यावर उतरून सरकारचा चक्काजाम करणार; उद्धव ठाकरे यांचा इशारा
पौर्णिमेच्या स्नानासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला, रेल्वेच्या धडकेत 8 जणांचा मृत्यू
शेतकरी म्हणून एकवटा, तुमची वज्रमूठ दाखवा आणि हे सरकार… उद्धव ठाकरे यांचे शेतकऱ्यांना आवाहन
मुंबईने बीजिंग आणि शांघायला टाकले मागे; आशियातील सर्वात आनंदी शहरात पटकावले अव्वलस्थान
वडाळा डेपोजवळ मोनोमध्ये बिघाड, ट्रायल दरम्यान झाला अपघात