आईच्या कुशीतून चोरलेले बाळ सहा तासांत आईच्या कुशीत, अपहरणकर्त्यासह आत्यावर पोलिसांची झडप

आईच्या कुशीतून चोरलेले बाळ सहा तासांत आईच्या कुशीत, अपहरणकर्त्यासह आत्यावर पोलिसांची झडप

 कल्याण रेल्वे स्थानकाच्या पुलावर गाढ झोपेत असलेल्या आईच्या कुशीतून आठ महिन्यांच्या बाळाचे एका तरुणाने अपहरण केले होते. बाळ चोरीस गेल्याच्या घटनेने कल्याणमध्ये खळबळ उडाली होती. मात्र कल्याण महात्मा फुले पोलीस आणि कल्याण रेल्वे पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत अपहरणकर्त्या तरुणांसह त्याच्या आत्यावर झडप घालून बाळाची सुखरूप सुटका केली. पोलिसांच्या तत्परतेमुळे अवघ्या सहा तासांत बाळ पुन्हा आईच्या कुशीत विसावले. आरोपी अक्षय खरे आणि सविता खरे यांना पोलिसांनी अटक केली आहे.

नीलेश पोंगरे व पूनम पोंगरे हे दाम्पत्य पुणे येथे राहतात. आज कामानिमित्त रेल्वेने कल्याणला आल्यानंतर पहाटे हे दाम्पत्य मुलासह स्टेशनवरील पुलावर झोपले होते. त्यांना जाग येताच बाळ चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी रेल्वे पोलीस ठाणे गाठत तक्रार नोंदवली.

हवालदार सोनावणे यांच्यामुळे गुंता सुटला

महात्मा फुले पोलीस ठाण्याचे हवालदार सतीश सोनवणे यांच्या सतर्कतेमुळे या प्रकरणाचा गुंता सुटला. सोनवणे यांनी सीसीटीव्हीत आरोपीला पाहताच ओळखले. यानंतर पोलिसांच्या पथकाने तत्काळ अक्षयचे घर गाठले असता घरात बाळ आढळून आले. अवघ्या सहा तासांच्या आत बाळाची चोरी करणाऱ्या अक्षय खरे आणि त्याची आत्या सविता खरे या दोघांना महात्मा फुले पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

“दिल से… माधुरी” शोसाठी 3 तास उशिरा पोहोचली माधुरी; नेटकऱ्यांनी सुनावलं “दिल से… माधुरी” शोसाठी 3 तास उशिरा पोहोचली माधुरी; नेटकऱ्यांनी सुनावलं
बॉलीवूडची धकधक गर्ल, सुप्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. कॅनडातील टोरंटो येथे “दिल से… माधुरी” हा शो...
पुणे महापालिका सहा एसटीपींच्या निविदांमध्ये सल्लागार कंपनीकडून आकडेवारीत गोलमाल ! 
सरकारने लवकर कर्जमुक्ती केली नाही तर महाराष्ट्रातील शेतकरी रस्त्यावर उतरून सरकारचा चक्काजाम करणार; उद्धव ठाकरे यांचा इशारा
पौर्णिमेच्या स्नानासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला, रेल्वेच्या धडकेत 8 जणांचा मृत्यू
शेतकरी म्हणून एकवटा, तुमची वज्रमूठ दाखवा आणि हे सरकार… उद्धव ठाकरे यांचे शेतकऱ्यांना आवाहन
मुंबईने बीजिंग आणि शांघायला टाकले मागे; आशियातील सर्वात आनंदी शहरात पटकावले अव्वलस्थान
वडाळा डेपोजवळ मोनोमध्ये बिघाड, ट्रायल दरम्यान झाला अपघात