निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं झाल्याची खात्री पटली, आयोगाच्या पत्रकार परिषदेवर राज ठाकरेंचा संताप

निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं झाल्याची खात्री पटली, आयोगाच्या पत्रकार परिषदेवर राज ठाकरेंचा संताप

“निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं झाल्याची खात्री पटली”, असा संताप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेवर व्यक्त केला आहे. दुबार मतदारांच्या प्रश्नावर आयोग निरुत्तर आहे, अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे. क्स वर एक पोस्ट करत त्यांनी हा संताप व्यक्त केला आहे.

X वर राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेची एक क्लिप शेअर करत राज ठाकरे म्हणाले आहेत की, “आजच्या निवडणुका आयोगाच्या पत्रकार परिषदेची क्लिप मला कोणीतरी पाठवली. ती पाहून तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १००% खात्री पटली की, निवडणूक आयोग स्वायत्त आहे, हे फक्त संविधानात आहे. हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं आहे.”

राज ठाकरे म्हणाले, “दुबार मतदार नोंदणीपासून ते मतदार यादीतील अनेक घोळ या सगळ्यावर एकही प्रश्न विचारल्यावर जर निवडणूक आयोगाला एकही उत्तर देता येत नसेल किंवा द्यायची इच्छा नसेल तर तुमचा उपयोग काय? जबाबदारी तर तुम्ही केंव्हाच झटकली आहेत, आत्ता उत्तरदायित्व पण नाकारणार, मग तुमच्या पदांच करायचं काय?”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणे महागात पडले, कोस्टल रोडच्या रेलिंगचे नुकसान प्रकरणी चालकाला 2.65 लाख रुपयांचा दंड मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणे महागात पडले, कोस्टल रोडच्या रेलिंगचे नुकसान प्रकरणी चालकाला 2.65 लाख रुपयांचा दंड
निष्काळजीपणे गाडी चालवल्यामुळे मुंबई कोस्टल रोडच्या रेलिंगचे नुकसान केल्याच्या आरोपाखाली बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) एका चालकाला 2.65 लाख रुपयांचा दंड ठोठावला...
निवडणूक आयोगाने जनतेच्या भावनांची दखल घेतली नाही, अंबादास दानवे यांची टीका
ट्रेनमध्ये जागा मिळाली नाही, मग आरामदायी प्रवासासाठी पट्ठ्याने अशी शक्कल लढवली की थेट तुरुंगात रवानगी
Ratnagiri News – भावी नगरसेवकांची आजपासून कसोटी, भगवा फडकविण्यासाठी शिवसैनिक सज्ज
Ahilyanagar News – दहशत निर्माण करणारा बिबट्या अखेर वन विभागाच्या जाळ्यात
निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची? आयोगाने जबाबदारीपासून पळ काढला – हर्षवर्धन सपकाळ
शिक्षेपूर्वीच दिर्घ तुरुंगवास भोगल्याने हायकोर्टाचा दिलासा, 2011 च्या तिहेरी बॉम्बस्फोटातील आरोपीला जामीन