शेतकऱ्यांना मदत पोहोचलीच नाही! मुख्यमंत्र्यांसमोर मंत्रिमंडळ बैठकीत मंत्री आणि अधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी

शेतकऱ्यांना मदत पोहोचलीच नाही! मुख्यमंत्र्यांसमोर मंत्रिमंडळ बैठकीत मंत्री आणि अधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी

अतिवृष्टीमुळे राज्यातील लाखो हेक्टर शेतजमिनीवरील पिक उद्ध्वस्त झाले. यामुळे शेतकरी हवालदील झाला. दिवाळीच्या आधी महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी ३१ हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा केली. पण ही घोषणा कागदावरच राहिली. दिवाळीत शेतकऱ्यांना मदत पोहोचलीच नाही, हे खुद्द सरकारमधील एका मंत्र्यानेचे म्हटले. राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हे पडसाद उमटले. या बैठकीत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत पोहोचवण्यावरून मंत्री आणि अधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

अतिवृष्टीसाठी जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांना मिळाली नाही, मंत्र्यांनी दाखवला आरसा; वडेट्टीवार यांचा महायुतीवर निशाणा

मंत्रिमंडळ बैठकीत मदत आणि पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांनी शेतकऱ्यांच्या मदतीवरून प्रश्न उपस्थित केला. अधिकारी म्हणतात सरकारकडून देण्यात आलेली मदत पोहोचली. जिल्हाधिकारी म्हणतात मदत पोहोचली. पण शेतकरी म्हणतात मदत पोहोचलीच नाही, असा आरोप मकरंद पाटील यांनी केला. मात्र, आमच्याकडून शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचली असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. अखेर मुख्यमंत्र्यांनी या वादात मध्यस्थी केली. आजच आतापर्यंत झालेल्या मदतीबाबत आढावा बैठक घ्या आणि किती मदत पोहोचली यासंदर्भात माहिती द्या, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्याचे सांगितले जात आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Red Wine Myths: रेड वाइन खरंच शरीरासाठी चांगली असते का? जाणून घ्या तज्ज्ञांकडून Red Wine Myths: रेड वाइन खरंच शरीरासाठी चांगली असते का? जाणून घ्या तज्ज्ञांकडून
वाइन पिणारे अनेकदा सांगतात, रेड वाइन आरोग्यासाठी फायदेशीर आणि हृदयासाठी चांगली आहे. म्हणून थोडी-थोडी रोज प्यावी. वाइन तज्ज्ञ सोनल हॉलंड...
Ratnagiri News – “बिन खुर्चीचा डॉक्टर” म्हणून ओळख असलेल्या डॉ. मधूकर लुकतुके यांचे निधन
मतांची चोरी करुन सत्तेत आलेले देवेंद्र फडणवीस हे चिप मुख्यमंत्री – हर्षवर्धन सपकाळ
Mumbai News – दिवाळीचा गृहपाठ पूर्ण केला नाही, आठवीच्या विद्यार्थिनीला ट्युशन टीचरकडून बेदम मारहाण
Ratnagiri News – आंजर्लेतील कड्यावरच्या गणपती मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी
महाराष्ट्रात हजारो मतांचा घोळ पुराव्यांसह निदर्शनास येतोय, निवडणूक आयोग झोपलंय का? जितेंद्र आव्हाड यांचा सवाल
Photo – ‘मोंथा’ चक्रीवादळाचा प्रभाव, मुंबईत दादर समुद्रकिनारी धोक्याचा लाल बावटा