बिहारमधील तरुणांच्या दुर्दशेसाठी भाजप-जेडीयू दोषी – राहुल गांधी

बिहारमधील तरुणांच्या दुर्दशेसाठी भाजप-जेडीयू दोषी – राहुल गांधी

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बिहारमधील भाजप-जेडीयू सरकारवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले आहेत की, काही दिवसांपूर्वी त्यांनी बिहारमधील तरुणांशी शिक्षण, आरोग्य आणि रोजगार यासारख्या मुद्द्यांवर चर्चा केली होती. राज्याच्या दुर्दशेसाठी भाजप-जेडीयू सरकार पूर्णपणे जबाबदार आहे. X वर एक पोस्ट करत ते असे म्हणाले आहेत.

राहुल गांधी म्हणाले आहेत की, “बिहारमधील तरुणांना हे चांगलेच माहिती आहे की, गेल्या २० वर्षात मोदी-नितीश सरकारने त्यांच्या आकांक्षांचा गळा दाबला आहे. राज्याला वाऱ्यावर सोडून दिले आहे आणि प्रत्येक पातळीवर राज्य रसातळाला ढकलले गेले आहे.”

राहुल गांधी म्हणाले आहेत की, “बिहारमध्ये त्यांना भेटलेले सर्व तरुण अत्यंत आशादायक आणि बुद्धिमान आहेत. त्यांची प्रतिभा आणि कठोर परिश्रम आपल्या देशाला पुढे घेऊन जाऊ शकतात. परंतु सरकारने त्यांना संधींऐवजी बेरोजगारी आणि निराशा दिली आहे.” ते म्हणाले की, “आता बदलाची वेळ आली आहे. बिहारचा स्वाभिमान पुन्हा जागृत करण्याची वेळ आली आहे.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सामायिक सुविधांचा लाभ घेणार्‍यांना मेंटेनन्स अनिवार्यच, उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय सामायिक सुविधांचा लाभ घेणार्‍यांना मेंटेनन्स अनिवार्यच, उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय
हाऊसिंग सोसायट्यांना भराव्या लागणाऱ्या मेंटेनन्सबाबत उच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निकाल दिला आहे. सहकारी गृहनिर्माण संस्थेतील फ्लॅटमधील रहिवासी जर इमारतीच्या सामाईक सुविधांचा...
भाजपच्या फायद्यासाठी काम करणाऱ्या निवडणूक आयोगाला नियमांनुसार काम करण्यास भाग पाडले पाहिजे – आदित्य ठाकरे
Ratnagiri News – वयाच्या ८३ व्या वर्षी माडबनमध्ये गंगाराम गवाणकरांनी तात्या सरपंच साकारला, नानांची पाळेमुळे गावातच रूजलेली
भाजपला मतदान करूनही आमचे हाल, परभणीत शेतकर्‍याने जिल्ह्याधिकार्‍यांची गाडी फोडली!
Red Wine Myths: रेड वाइन खरंच शरीरासाठी चांगली असते का? जाणून घ्या तज्ज्ञांकडून
Ratnagiri News – “बिन खुर्चीचा डॉक्टर” म्हणून ओळख असलेल्या डॉ. मधूकर लुकतुके यांचे निधन
मतांची चोरी करुन सत्तेत आलेले देवेंद्र फडणवीस हे चिप मुख्यमंत्री – हर्षवर्धन सपकाळ