राधाकृष्ण ते कांतारा… जूचंद्रच्या रांगोळी कलावंतांनी जिंकली मने

राधाकृष्ण ते कांतारा… जूचंद्रच्या रांगोळी कलावंतांनी जिंकली मने

तालुक्यातील जूचंद्र गाव म्हटले की डोळ्यासमोर येते ती या मातीतील कला. यात नाटय़ कला, भजन आणि रांगोळी या कलेच्या प्रांतात येथील तरुण आणि तरुणींनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांची कला सातासमुद्रापार गेली आहे. येथील कलाकार हे दरवर्षी दिवाळीत एकत्र येऊन आपल्या कलेचे प्रदर्शन रसिकांना घडवत आहेत. या वर्षीही त्यांनी भरवलेल्या रांगोळी प्रदर्शनात शिवाजी महाराज, हिंदुस्थानी सैनिक, एकवीरा देवी, बाल गणेश, थ्रीडी रांगोळी, राधा-कृष्ण, युद्ध आणि युद्धातील स्थिती यावरील रांगोळ्या रसिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. या रांगोळ्यांचे प्रदर्शन कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनात मनोज पाटील, प्रवीण भोईर, जय म्हात्रे, करण वटा, गणेश सालियन, साई भोईर, संजय पाटील, केतन पाटील, हर्षद पाटील व इतर रांगोळी कलाकारांनी रांगोळ्या साकारल्या आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘हे’ दोन देश अजूनही मुलांना अपंग करणाऱ्या ‘या’ आजाराशी झुंज देत आहे, जाणून घ्या ‘हे’ दोन देश अजूनही मुलांना अपंग करणाऱ्या ‘या’ आजाराशी झुंज देत आहे, जाणून घ्या
जागतिक स्तरावर संसर्गजन्य रोगांमुळे दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू होतो. काही आजार फार जीवघेणा नसतात, परंतु यामुळे आजीवन अपंगत्वासारख्या समस्यांचा धोका...
गर्भवती होण्यासाठी योग्य वय काय? जाणून घ्या
Mumbai News – आधी ब्रेकअप मग पॅचअपचा प्रयत्न, भेटायला बोलावून प्रेयसीवर हल्ला करत प्रियकराने जीवन संपवलं
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घ्यावी, डॉक्टर आत्महत्येप्रकरणी पंकजा मुंडे यांची मागणी
अफगाणिस्तानला दुहेरी झटका, झिम्बाब्वेने केलं धोबीपछाड आणि ICC ने सर्व संघाला ठोठावला दंड; तब्बल 12 वर्षांनी…
Ahilyanangar news – आई ‘वाघिण’ बनली अन् बिबट्याशी झुंज देत 5 वर्षांच्या मुलाची सुटका केली, शिंगणापूरमधील थरार
अभिनेता श्रेयस तळपदे, आलोक नाथ यांच्यासह 22 जणांवर गुन्हा दाखल; 5 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप