Navi Mumbai news – उलवेत एकाच कुटुंबातील पाच जण अत्यवस्थ; एकाचा मृत्यू

Navi Mumbai news – उलवेत एकाच कुटुंबातील पाच जण अत्यवस्थ; एकाचा मृत्यू

उलवे येथील जावळे गावातील एकाच कुटुंबातील पाच जण घरात अत्यवस्थ अवस्थेत सापडल्याची घटना घडली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत सर्वांना रुग्णालयात दाखल केले. परंतू त्यातील संतोष लुहार (२२) याचा मृत्यू झाला. दरम्यान, ही घटना नेमकी कशामुळे घडली याचा तपास पोलीस करीत आहेत.

जावळे येथील सेक्टर-५ मध्ये रमेश लुहार (२७) त्यांची पत्नी बसंती लुहार (२५), धाकटा भाऊ संतोषकुमार आणि मुलगा आयुष, आर्यन असे पाच जण वास्तव्यास आहेत. दरवाजा उघडत नसल्याने शेजाऱ्यांनी आज दुपारी पोलिसांना माहिती दिली. या घटनेची गंभीरपणे दखल घेऊन आपल्या सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर दरवाजा तोडून घरात प्रवेश केल्यानंतर पाचही सदस्य अत्यवस्थ स्थितीत आढळून आले. त्यांना तत्काळ पनवेलच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘हे’ दोन देश अजूनही मुलांना अपंग करणाऱ्या ‘या’ आजाराशी झुंज देत आहे, जाणून घ्या ‘हे’ दोन देश अजूनही मुलांना अपंग करणाऱ्या ‘या’ आजाराशी झुंज देत आहे, जाणून घ्या
जागतिक स्तरावर संसर्गजन्य रोगांमुळे दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू होतो. काही आजार फार जीवघेणा नसतात, परंतु यामुळे आजीवन अपंगत्वासारख्या समस्यांचा धोका...
गर्भवती होण्यासाठी योग्य वय काय? जाणून घ्या
Mumbai News – आधी ब्रेकअप मग पॅचअपचा प्रयत्न, भेटायला बोलावून प्रेयसीवर हल्ला करत प्रियकराने जीवन संपवलं
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घ्यावी, डॉक्टर आत्महत्येप्रकरणी पंकजा मुंडे यांची मागणी
अफगाणिस्तानला दुहेरी झटका, झिम्बाब्वेने केलं धोबीपछाड आणि ICC ने सर्व संघाला ठोठावला दंड; तब्बल 12 वर्षांनी…
Ahilyanangar news – आई ‘वाघिण’ बनली अन् बिबट्याशी झुंज देत 5 वर्षांच्या मुलाची सुटका केली, शिंगणापूरमधील थरार
अभिनेता श्रेयस तळपदे, आलोक नाथ यांच्यासह 22 जणांवर गुन्हा दाखल; 5 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप