भाजपमध्ये गेल्यावर हत्या गोळीबाराचे गुन्हे माफ होत असतील तर या देशाचं कायद्याचं पुस्तक कामाचं नाही, ते जाळावं लागेल – संजय राऊत

भाजपमध्ये गेल्यावर हत्या गोळीबाराचे गुन्हे माफ होत असतील तर या देशाचं कायद्याचं पुस्तक कामाचं नाही, ते जाळावं लागेल – संजय राऊत

रामदास कदम यांच्याबाबत बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर व महायुती सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी ”रामदास कदम यांनी जी थुंकी उडवली आहे ती त्यांना गिळावीच लागेल” असा टोला देखील त्यांना लगावला.

”अनिल परब यांनी अत्यंत व्यवस्थित पणे एक भूमिका मांडली आहे. कदम व त्यांच्या चिरंजीवांनी जे घोटाळे आणि गुन्हे केले आहेत. ही चिंतेची गोष्ट आहे. अशा प्रकारे मंत्री काम करत असतील. तर देवेंद्र फडणवीस गुंडांची टोळी चालवत आहेत. स्वत: रामदास कदम यांनी सांगितले आहे की विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या सुचटनेवरून संशयास्पद व्यक्ती घाय़वळला शस्त्र परवाना दिला. पोलीस आयुक्तांनी घायवळ याला परवाना देऊ नका असे सांगितले होते, जर तो अहवाल बाजूला ठेवून गृहराज्यमंत्री परवाना देत असतील तर मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस हे सरकार नाही तर गुंडांची टोळी चालवतायत. भाजपने राज्यातल्या सर्व गुंड टोळ्या आपल्या प्रचारात उतरवल्या होत्या. आजही गुंडांना, भ्रष्टाचारांना पोसणारा पक्ष म्हणून भाजपकडे बोट दाखवलं जातंय. नाशिकमध्ये ज्यांनी गोळीबार केला, त्यामध्ये काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेली लोकं आहेत, त्यांना अटक व्हायला हवी. भाजपमध्ये गेल्यावर खून हत्या गोळीबार चोरी असे गुन्हे माफ होत असतील तर या देशाचं कायद्याचं पुस्तक कामाचं नाही, ते जाळावं लागेल, अशा शब्दात संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना फटकारले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

केवळ 10 मिनिटं चालल्याने युरिक एसिड आणि सांधेदुखी नियंत्रणात?, तज्ज्ञांचा सल्ला काय ? केवळ 10 मिनिटं चालल्याने युरिक एसिड आणि सांधेदुखी नियंत्रणात?, तज्ज्ञांचा सल्ला काय ?
हाय युरिक एसिड म्हणजे हायपरयूरिसीमिया आता केवळ सांधेदुखीची समस्या न रहाता किडनी आणि मेटाबॉलिझमला देखील प्रभावित करत आहे. शरीरात युरिक...
प्रवाशांना घेऊन जाणारी बोट समुद्रात उलटली, 14 जणांचा मृत्यू
अमृतसर-पूर्णिया जनसेवा एक्सप्रेसमध्ये भीषण आग, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली
पोलीस असल्याचे सांगत घरात शिरले, सात जणांकडून महिलेवर सामूहिक बलात्कार
फलटणच्या महिला डॉक्टरची आत्महत्या गृहविभागाच्या अब्रूची लक्तरे वेशीला टांगणारी, गृहखाते झेपत नसेल तर राजीनामा द्या; हर्षवर्धन सपकाळ
त्वचेच्या समस्येत गुणकारी आहे हे पतंजलीचे औषध, संशोधकांचा दावा
Jammu Kashmir – राज्यसभा निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सचा बोलबाला, तीन जागांवर विजय; भाजपला एक जागा