मुख्यमंत्री पदासाठी तेजस्वी आघाडीचा चेहरा, बिहारच्या उपमुख्यमंत्री पदासाठी व्हीआयपीचे साहनी यांचे नाव

मुख्यमंत्री पदासाठी तेजस्वी आघाडीचा चेहरा, बिहारच्या उपमुख्यमंत्री पदासाठी व्हीआयपीचे साहनी यांचे नाव

बिहार विधानसभा निवडणूक राष्ट्रीय जनता दलाच्या नेतृत्वात महाआघाडी करून लढण्याचा निर्णय कॉँग्रेससह विरोधी पक्षांनी घेतला आहे. राजदचे तेजस्वी यादव हे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील. तर व्हीआयपीचे मुकेश साहनी उपमुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील, अशी घोषणा कॉँग्रेस नेते अशोक गेहलोत यांनी महाआघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत केली.

कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांनी पाटणा येथे राजद नेते लालूप्रसाद यादव व तेजस्वी यादव यांची भेट घेऊन चर्चा केली आणि महाआघाडीत निर्माण झालेला तिढा सोडवला. महाआघाडीतील सर्वांची मते विचारात घेतल्यानंतर या विधानसभा निवडणुकीसाठी तेजस्वी यादव हे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील, तर मुकेश साहनी उपमुख्यमंत्री पदाचे उमेदवार असतील. अन्य उपमुख्यमंत्री मागासवर्गीय समाजातील असेल, असे गेहलोत यांनी जाहीर केले. तेजस्वी यादव आमचे नेते आहेत. एनडीएने त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल हे जाहीर करावे. आम्ही नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवू असे म्हणणे पुरेसे नाही, असे गेहलोत म्हणाले.

तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवला आहे. मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. मी सर्वांना सांगू इच्छितो की, त्यांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाचे मी पालन करेन. मी 20 वर्षांचे अकार्यक्षम सरकार उलथवून टाकेन. – तेजस्वी यादव, राजद नेते

महागठबंधनमधील पक्ष

राष्ट्रीय जनता दलाच्या नेतृत्वाखाली बिहारमध्ये काही विरोधी पक्षांनी एकत्र येत महाआघाडी तयार केली आहे. यामध्ये काँग्रेससह विकासशील इन्सान पार्टी (व्हीआयपी), दीपांकर भट्टाचार्य यांच्या नेतृत्वाखालील भाकप (सीपीआय-एमएल), भारतीय कम्युनिस्ट पार्टी (सीपीएम-मार्क्सवादी), भारतीय कम्युनिस्ट पार्टी (सीपीआय) या पक्षांचा समावेश आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

शेतकऱ्यांच्या न्यायासाठी राज्यभर आंदोलन; मनोज जरांगे यांची घोषणा शेतकऱ्यांच्या न्यायासाठी राज्यभर आंदोलन; मनोज जरांगे यांची घोषणा
मराठा आरक्षणासाठी राज्यात रान पेटवणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे आता शेतकर्यांच्या मदतीसाठी मैदानात उतरले आहेत. अतिवृष्टीमुळे राज्यातील २९ जिल्ह्यांमध्ये झालेल्या...
माझ्यावर चार वेळा लैंगिक अत्याचार, मानसिक छळ; पेनाने हातावर लिहित फलटणमध्ये महिला डॉक्टरनं घेतला गळफास
अमेरिकेचे रशियावर निर्बंध, चीननेही घेतला मोठा निर्णय; जागतिक बाजारात अस्थिरता वाढणार?
काही पदार्थ हे गरम असतानाच का खायला हवेत, वाचा
शक्तिपीठ मार्ग बदलणार; नवा मार्ग सोलापूर, सांगलीतून जाणार
संगमनेरमधील बोगस मतदारांचा आकडा 15 हजारांपर्यंत जाईल;बाळासाहेब थोरात यांचा दावा
Mehul Goswami – शासकीय सेवेत असतानाही दुसरी नोकरी करणे भोवलं; कर्मचाऱ्याला अटक, 15 वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता