कफ सिरपमुळे किडनी निकामी झाली, सहा बालकांच्या मृत्यूने खळबळ

कफ सिरपमुळे किडनी निकामी झाली, सहा बालकांच्या मृत्यूने खळबळ

मध्य प्रदेशमधील छिंदवारा येथे कफ सिरपमुळे सहा बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कफ सिरपमुळे या सर्व बालकांच्या किडन्या निकामी पडल्या असून त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे बायोप्सी अहवालात म्हटले आहे. या सर्व घटना गेल्या 15 दिवसांतील असून त्यामुळे दोन कफ सिरपवर बंदी घालण्यात आले आहे.

मृतांमधील सर्व मुलं ही पाच वर्षांच्या खालच्या वयाची आहेत. या सर्व मुलांना खोकला ताप आल्यामुळे स्थानिक डॉक्टरने त्यांना एक कफ सिरप व काही औषधे लिहून दिली होती. त्याने ती मुलं बरी देखील झाली. मात्र नंतर पुन्हा त्यांना ताप आला व त्याना लघवीला त्रास होऊ लागला. तसेच काही मुलांमध्ये लघवी होणेच बंद झाले होते. या मुलांची तब्येत अवघ्या काही दिवसात इतकी बिघडली की त्यांच्या किडन्या निकाम्या झाल्या. या मुलांना त्यांच्या पालकांनी तत्काळ रुग्णालयात दाखल केले होते. मात्र त्या कफ सिरपचा किडनीवरील परिणाम इतका जास्त होता की उपचारांआधीच मुलांच्या किडन्या निकामी झाल्या होत्या.

या सर्व मुलांचे बोयोप्सी अहवाल समोर आल्यानंतर त्यांच्या शरीरात डायथीलेन ग्लायकॉल कंटॅमिनेशन हे टॉक्सिक केमिकल आढळून आले. या सर्व मुलांनी मृत्यूच्या काही दिवस आधी कोल्ड्रीफ व नेक्स्ट्रो डीएस ही कफ सिरप घेतली होती. या घटनांनंतर छिंदवाडाच्या कलेक्टरने या दोन्ही कफ सिरपवर बंदी घातली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

8 तास झोपल्यानंतरही थकवा आणि सुस्ती येते का? कारण जाणून घ्या 8 तास झोपल्यानंतरही थकवा आणि सुस्ती येते का? कारण जाणून घ्या
रोजच्या धकाधकीच्या जीवनात अनेकांची पूर्ण झोप देखील होत नाही. थकवा आणि सुस्तीचे कारण नेहमीच झोपेची कमतरता आणि विश्रांतीचा अभाव हे...
बेस्टकडे स्वतःच्या मालकीच्या बस सर्वात कमी, भविष्यात आकडा शून्य होण्याची भिती
मानव आणि बिबट्यांचे संघर्ष रोखण्याठी बिबट्यांचे निर्बीजीकरण करणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती
तुमच्या आजुबाजूला असलेल्या या 10 गोष्टी असतात जंतूंनी भरलेल्या; तुम्ही त्यांना दररोज स्पर्श करता, जाणून धक्का बसेल
बीडमध्ये अंत्यविधी कार्यक्रमात पिकअप घुसला; एकाचा मृत्यू, एक गंभीर
फाशीऐवजी प्राणघातक इंजेक्शनचा वापर का नाही? सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सवाल
निवडणूक आयोगाशी काय झाली चर्चा? राज ठाकरे यांनी ट्वीट करत दिली माहिती